अभिनेते प्रवीण तरडे यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘बलोच’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन यात घडणार आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर, गाणी सर्वांनाच प्रेक्षक पसंती देताना दिसत आहे. नुकतंच प्रवीण तरडे यांनी मराठी भाषेविषयी त्यांचे मत मांडले आहे.

पिंपरी चिंचवड येथे ‘दिशा सोशल फाउंडेशन’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रवीण तरडे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान प्रवीण तरडे यांनी मराठी भाषेबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “माझा रोमँटिक अंदाज पाहून पत्नीला धक्का बसला”, प्रवीण तरडेंनी केलेले ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाले “ती सोडून…”

after controvrcial remark on rahul gandhi bonde said in sense my statement makes mother angry with child
नागपूर : राहुल गांधींवर टीका करणारे भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले ” माझे वक्तव्य आई मुलाला रागावते त्या अर्थाने “
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
marathwada mukti sangram din
Marathwada Liberation Day : मुक्तिसंग्रामानंतरची मराठवाड्याची मानसिक गुंतागुंत!
prasad oak talking about new home
“लोकांना वाटतं शासकीय कोट्यातून…”, नव्या घराबद्दल स्पष्टच बोलला प्रसाद ओक; ट्रोलर्सला सुनावत म्हणाला, “२८ वर्षे राबून घर घेतलं”
Loksatta vyaktivedh Avinash Avalgaonkar Chancellor of Riddhapur Marathi Language University
व्यक्तिवेध: डॉ. अविनाश आवलगावकर
lokrang
पडसाद: तार्किक बुद्धी वापरावी
Indian society, Ramayana, Mahabharata, positive ideals, negative tendencies, Rama, Krishna, Ravana, Duryodhana, social consciousness, judicial system, cultural influence,
रावणाच्या मर्यादांची प्रतिष्ठापना आज आवश्यक आहे…
Actress Sonalee Kulkarni Statement
Sonali Kulkarni : “अनेकदा वाटतं मुंबईतून मराठी माणसं संपत चालली आहेत का? पण..”, सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत

“मराठी भाषा ही अशी भाषा आहे जी भावनिक भाषा अजिबात नाही. मराठी भाषा ही भावनिक भाषा अजिबातच नाही, त्यामुळे आपल्या भाषेतल्या शिव्या देखील जिव्हारी लागतात. जेव्हा कोणी आपल्याला इंग्रजीत शिव्या देतं, तेव्हा आपल्याला राग येत नाही. पण तिची शिवी आपल्याला कोणी मराठीत दिली तर आपला संताप होतो.

कारण आपली भाषा जहरी आहे. आपली भाषा ताकदवान आहे. मराठी भाषा येणं हे येड्या गबाळ्याचं काम नाही. मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषांमध्ये गणली गेलीच पाहिजे आणि आजही गणली जाते. कारण छत्रपती शिवाजी महाराज ही भाषा बोलत होते. त्याचवेळी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत रामदास स्वामी हे देखील हीच भाषा बोलत होते. प्रत्येकाची भाषा बोलण्याची पद्धत वेगळी होती”, असे प्रवीण तरडेंनी म्हटले.

आणखी वाचा : “पानिपत ही मराठ्यांची शेवटची लढाई नव्हती…” प्रवीण तरडेंच्या बहुचर्चित ‘बलोच’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

दरम्यान प्रवीण तरडेंनी ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ यासारखे चित्रपट दिले आहेत. प्रवीण तरडे यांना त्यांच्या ‘धर्मवीर’ चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सध्या ते ‘बलोच’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यानंतर लवकरच प्रवीण तरडे ‘मुळशी पॅटर्न २’ आणि ‘धर्मवीर २’ हे दोन्ही चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत.