मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार हे त्यांच्या खास शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करतात. आपल्या सहज अभिनयाने कलाकृतीला न्याय देण्याचे काम हे कलाकार करीत असतात. त्यामुळे त्यांचा वेगळा चाहतावर्ग तयार होतो. अशा कलाकारांपैकी एक अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे हे आहेत.

मराठी चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी स्वत:च्या अभिनयाची छाप प्रेक्षकवर्गावर निर्माण केली आहे. ‘सरकारनामा’, ‘वास्तव’, ‘सातच्या आत घरात’, ‘सावरखेड : एक गाव’, ‘खबरदार’, ‘शुभमंगल सावधान’, ‘कापूस  कोंड्याची  गोष्ट’, ‘आमच्या सारखे आम्हीच’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता एका मुलाखतीत मराठी सिनेमाच्या व्यवसायाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

sajid nadiadwala written lai bhaari story
Video : ‘या’ हिंदी चित्रपट निर्मात्याने लिहिली ‘लय भारी’ सिनेमाची कथा; आमिर खानही ऐकून झाला चकित; म्हणाला, “त्याचा चेहरा बघून…”
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Hemal Ingle
“शब्दांच्या पलीकडे…”, ‘नवरा माझा नवसाचा २’फेम अभिनेत्रीचे कोकणाविषयी वक्तव्य; म्हणाली, “माझ्यासाठी खूप…”
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
sai tamhankar talk about first time of bigg boss marathi season 5
सई ताम्हणकरला आवडला ‘बिग बॉस मराठी’तील ‘या’ सदस्याचा स्वभाव, निक्की तांबोळीचा उल्लेख करत म्हणाली…
Prajkata Mali
“अत्यंत स्वाभिमानी…”, प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’विषयी खुलासा; म्हणाली, “पुण्यात आल्यावर शास्त्रीबुवांचा परीसस्पर्श…”
pooja sawant share family photo on social media on the occasion of ganesh festival
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मायदेशी परतली पूजा सावंत, कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर करीत म्हणाली…
We celebrate Teachers Day but when will we do deep teacher training
आपण शिक्षक दिन साजरे करतो, पण प्रगल्भ शिक्षकनिर्मिती कधी करणार?

काय म्हणाले मकरंद अनासपुरे?

अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मकरंद अनासपुरे यांनी नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत मराठी सिनेमाच्या व्यवसायाविषयी बोलताना त्यांनी म्हटले, “दिवसा किंवा अगदी दररोज नाटक होत नाही. चार-चार प्रयोग होत नाहीत. तिथे सिनेमापण दाखवा आणि ४० रुपये, ३० रुपये, असा तिकीट दर ठेवा. एसटीचा ब्रॅण्ड अॅम्बेसॅडर मला केल्यानंतर मी त्या भाषणातही बोललो होतो की, तालुका लेव्हलचे जे एसटी डेपो आहेत तिथे मिनी प्लेक्स करा. ५०-१०० कॅपॅसिटीचे आणि २० रुपये, ४० रुपये असे तिकीट ठेवा. लोक बघतील ना.” त्यावर अमोल परचुरे यांनी, “हे मी २०१२ पासून ऐकतोय”, असे म्हटले.

हेही वाचा: Dadasaheb Phalke Award : दादासाहेब फाळके पुरस्काराची परंपरा कधी सुरु झाली? काय असतं पुरस्काराचं स्वरुप? कोण कोण आहेत मानकरी?

त्यावर पुढे बोलताना मकरंद अनासपुरे यांनी म्हटले, “बघ १२-१५ वर्ष झाली. आपण बांधलंय ते. त्यातून आऊटपुट यायला पाहिजे. हे इतकं साधं आहे. मराठी सिनेमा जास्तीत जास्त ठिकाणी २० रुपये, ४० रुपये, ५० रुपये या दरांत पाहायला मिळाला, तर मराठी सिनेमाचा व्यवसाय चांगला होऊ शकतो.”

हेही वाचा: “…अन् कार दुभाजकावर आदळली”, बॉलीवूड अभिनेत्याने सांगितला अपघाताचा घटनाक्रम; म्हणाला, “माझ्या मुलाला वाटलं मी मेलो”

दरम्यान, मकरंद अनासपुरे अभिनय क्षेत्राबरोबरच मकरंद अनासपुरे यांचा सामाजिक कार्यातदेखील योगदान आहे. २०१५ मध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्याबरोबर नाम फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. याद्वारे ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम करतात.