प्रिया बापट ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. गेली अनेक वर्षं ती मालिका, नाटक, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आतापर्यंत तिने अनेक चित्रपट केले. पण छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळवूनही ती मालिकांमध्ये फार काम करताना दिसली नाही. आता तिने यामागचं कारण सांगितलं आहे.

प्रियाने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. ‘दे धमाल’ या मालिकेत ती झळकली. तर त्यानंतर तिने ‘अधुरी एक कहाणी’, ‘शुभंकरोती’ या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. तिने साकारलेल्या या भूमिकांचं खूप कौतुक झालं. पण ती मोठ्या पडद्यावर अधिक रमली. तिने ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘टाईमपास २’, ‘टाईमपास ३’, ‘वजनदार’ अशा विविध चित्रपटांमधून काम केलं. ती मुद्दामच मालिकांपासून लांब राहिली. आता याचं नेमकं कारण काय याचा खुलासा तिने केला आहे.

Paani Movie on the Water Crisis
Paani Movie Review : पाणी संघर्षाला प्रेमाचा ओलावा
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
varun dhawan plays spy role for the first time in web series citadel honey bunny
गुप्तहेराच्या भूमिकेत वरुण धवन; ‘सिटाडेल’च्या भारतीय आवृत्तीची झलक प्रेक्षकांसमोर
The application deadline for Ladki Bahin Yojana ends today Print politics news
‘लाडक्या बहिणीं’ची बँकांमध्ये झुंबड; आज अखेरचा दिवस, बँक खात्याशी आधार कार्ड जोडणीसाठी महिलांची गर्दी
hurricane milton
विश्लेषण: अमेरिकेत यंदा वाढीव चक्रीवादळांचा ‘सीझन’? अजस्र ‘मिल्टन’नंतरही धडकत राहणार संहारक वादळे?
Nilima Sheikh Kashmir paintings
कलाकारण: काश्मीरची पिछवाई…
salmon sperm facial
‘सॅल्मन स्पर्म फेशियल’ काय आहे? हॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये याची लोकप्रियता का वाढतेय?
actress priya bapat interview loksatta
Raat Jawaan Hai Promotion: भिन्न प्रकृतीची चारही माध्यमे वैशिष्ट्यपूर्ण; अभिनेत्री प्रिया बापटचे मत

आणखी वाचा : तंदुरुस्त आरोग्य अन् नितळ त्वचा; प्रिया बापटने उघड केलं रहस्य, म्हणाली…

‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी ‘आभाळमाया’ आणि ‘अधुरी एक कहाणी’ या मालिका केल्या तेव्हा मी शिकत होते. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात काम केल्यानंतर मी अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. २०१० साली मी ‘शुभंकरोती’ मालिकेत काम केलं. पण मी मालिका या माध्यमामध्ये रमू शकले नाही. ही मालिका संपल्यानंतर मी ‘नवा गडी नवं राज्य’ हे नाटक, ट्रॅव्हल शो, ‘काकस्पर्श’, ‘टाईमप्लीज’ अशा वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये काम केलं. त्यानंतर आपण फक्त चित्रपटच करायचे हा माझा निर्णय पक्का होता. कारण मी रोज सकाळी उठून सेटवर जाऊन एकच भूमिका नाही साकारू शकत. तो माझा स्वभावच नाही आणि म्हणून मी मालिकांपासून लांब राहिले.”

हेही वाचा : ‘हा’ एक नियम मोडला म्हणून प्रिया बापटला आईने ठेवलं होतं घराबाहेर, आठवण सांगत म्हणाली…

पुढे ती म्हणाली, “फक्त चित्रपटांमध्ये काम करण्याच्या माझ्या निर्णयाला उमेशचा चांगला पाठिंबा होता. फक्त मराठी चित्रपटांमध्ये काम करून कोणाचं काही भागू शकत नाही. या माध्यमाची आर्थिक गणितं वेगळी असतात. त्यामुळे जेव्हा मी फक्त चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला उमेशने सांगितलं, मालिकांमध्ये काम करून पैसे कमावतो आहे त्यामुळे तू भूमिका निवडताना चोखंदळ राहा. तर दुसरीकडे मध्यंतरीच्या काळात मी कामामध्ये खूप व्यग्र होते. मी हिंदी प्रोजेक्टमध्ये काम करत होते. त्यामुळे त्याप्रमाणे आर्थिक गणितही बदलत होती. तेव्हा मग मी त्याला सांगितलं की आता तू चित्रपटांसाठी थांब. मालिकांमध्ये काम करू नकोस. नात्यात हा समतोल असणं महत्वाचं असतं.”