हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केल्यानंतर रितेश देशमुख मराठी चित्रपटांकडे वळला. काही महिन्यांपूर्वीच त्याचा प्रदर्शित झालेला ‘वेड’ चित्रपट सुपरहिट ठरला. ७० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई या चित्रपटाने केली. मराठी चित्रपटांवर त्याचं खूप प्रेम आहे हे याआधीही त्याने बऱ्याच मुलाखतींमध्ये म्हटलं. पण मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर का चालत नाहीत? याबाबत आता रितेशने उघडपणे भाष्य केलं आहे.

रितेशने ‘लय भारी’, ‘माऊली’ सारखे मराठी चित्रपट केले. त्याच्या या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळाला. पण बरेच मराठी चित्रपट का चालत नाहीत? याबाबत ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. “मराठी चित्रपट न चालण्यामागे नेमकी काय अडचण आहे?” असा प्रश्न रितेशला विचारण्यात आला.

Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”
salim javed marathi news
सलीम-जावेद यांची जोडी का दुभंगली?
Kranti Redkar twin daughters started crying After watching the movie Kakan
Video: “मम्मा, तू चुकीचा चित्रपट बनवला…” ‘काकण’ची कथा ऐकून क्रांती रेडकरच्या मुली ढसाढसा लागल्या रडू, म्हणाल्या…
old movies, mumbai, movies re-released,
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन; नवीन चित्रपट नसल्याने चार जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित
old bollywood gang of vasepur and marathi tumbad movie rerealse in theatre
‘या’ सुपरहिट मराठी चित्रपटासह गाजलेले हिंदी सिनेमे पुन्हा थिएटर्समध्ये होणार प्रदर्शित, वाचा यादी
pravin tarde
पहिलाच दाक्षिणात्य चित्रपट आणि मुख्य खलनायकाची भूमिका; अनुभव सांगताना प्रवीण तरडे म्हणाले, “मी कधीच असं…”

आणखी वाचा – अक्षया देवधरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सुयश टिळकची झाली होती अशी अवस्था, खुलासा करत म्हणाला, “त्या परिस्थितीत…”

आणखी वाचा – CSKच्या विजयानंतर ऋतुराज गायकवाडवरुन कमेंट करणाऱ्यांना सायली संजीवचं उत्तर, म्हणाली, “त्याचं जेव्हा लग्न होईल तेव्हा…”

यावेळी रितेश म्हणाला, “उत्तम कंटेंटशिवाय कोणतीही चित्रपटसृष्टी ही चालत नाही. कंटेंटचा आदर आपण केलाच पाहिजे. पण सगळ्यात मोठी गोष्टी म्हणजे बजेट असणं महत्त्वाचं आहे. कोणत्याही चित्रपटसृष्टीमध्ये बजेट हा महत्त्वाचा भाग असतो. कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो चित्रपटगृहामध्ये जाऊन आपण पाहावा असं प्रेक्षकांना वाटलं पाहिजे. दुर्देवाने आपल्या मराठीमध्ये असं घडत नाही”.

आणखी वाचा – “तिच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणीतरी आलं आणि…” एक्स गर्लफ्रेंड अक्षया देवधरबाबत सुयश टिळकचं भाष्य, म्हणाला, “आजही आमच्यामध्ये…”

“एखादा मराठी चित्रपट जर प्रदर्शित झाला तर पुढच्या आठवड्यात जाऊन आपण पाहिला पाहिजे असं प्रेक्षक विचार करतात. पण पुढच्या आठवड्यात तो मराठी चित्रपट चित्रपटगृहामध्ये नसतो. हिंदी चित्रपटांचा प्रोमो पाहिला की, प्रेक्षक म्हणतात आम्हाला हा चित्रपट बघायचा आहे. पण हेच अनुभवायची संधी आपण मराठी चित्रपटाला देत नाही. कोणीतरी एखाद्या मराठी चित्रपटाबाबत सांगितलं तरच तो चित्रपट बघायला जायचं की नाही हे प्रेक्षक ठरवतात. हिंदी चित्रपटासारखा मराठी चित्रपटाबाबत प्रेक्षक विचार करत नाहीत. हे कुठेतरी प्रेक्षकांनी बदलायला हवं. पण एखादा चित्रपट जर प्रेक्षकांना आवडला तर तो चित्रपट तुफान चालतो”.