हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केल्यानंतर रितेश देशमुख मराठी चित्रपटांकडे वळला. काही महिन्यांपूर्वीच त्याचा प्रदर्शित झालेला ‘वेड’ चित्रपट सुपरहिट ठरला. ७० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई या चित्रपटाने केली. मराठी चित्रपटांवर त्याचं खूप प्रेम आहे हे याआधीही त्याने बऱ्याच मुलाखतींमध्ये म्हटलं. पण मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर का चालत नाहीत? याबाबत आता रितेशने उघडपणे भाष्य केलं आहे.

रितेशने ‘लय भारी’, ‘माऊली’ सारखे मराठी चित्रपट केले. त्याच्या या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळाला. पण बरेच मराठी चित्रपट का चालत नाहीत? याबाबत ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. “मराठी चित्रपट न चालण्यामागे नेमकी काय अडचण आहे?” असा प्रश्न रितेशला विचारण्यात आला.

Saif Ali Khan
“दरोड्याचा प्रयत्न फसला…”, सैफ अली खानचे हल्लेखोराबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, “त्या बिचाऱ्या…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
lakshmi niwas jayant real face reveal
आधी झुरळ खाल्लं, आता घडणार ‘असं’ काही…; जान्हवीसमोर येतंय जयंतचं वेगळंच रुप! नेटकरी म्हणाले, “हिंदी मालिकेची कॉपी…”
Rajkummar Hirani
राजकुमार हिरानींनी सांगितलं ‘संजू’ चित्रपट बनवण्याचं खरं कारण; म्हणाले, “त्याने मला भेटण्यासाठी बोलावलं…”
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
Pankaja Munde on Dhananjay Munde
“धनंजय मुंडे फडणवीस-पवारांचे खास, राजीनामा मागणार नाहीत”, क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर; म्हणाल्या…

आणखी वाचा – अक्षया देवधरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सुयश टिळकची झाली होती अशी अवस्था, खुलासा करत म्हणाला, “त्या परिस्थितीत…”

आणखी वाचा – CSKच्या विजयानंतर ऋतुराज गायकवाडवरुन कमेंट करणाऱ्यांना सायली संजीवचं उत्तर, म्हणाली, “त्याचं जेव्हा लग्न होईल तेव्हा…”

यावेळी रितेश म्हणाला, “उत्तम कंटेंटशिवाय कोणतीही चित्रपटसृष्टी ही चालत नाही. कंटेंटचा आदर आपण केलाच पाहिजे. पण सगळ्यात मोठी गोष्टी म्हणजे बजेट असणं महत्त्वाचं आहे. कोणत्याही चित्रपटसृष्टीमध्ये बजेट हा महत्त्वाचा भाग असतो. कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो चित्रपटगृहामध्ये जाऊन आपण पाहावा असं प्रेक्षकांना वाटलं पाहिजे. दुर्देवाने आपल्या मराठीमध्ये असं घडत नाही”.

आणखी वाचा – “तिच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणीतरी आलं आणि…” एक्स गर्लफ्रेंड अक्षया देवधरबाबत सुयश टिळकचं भाष्य, म्हणाला, “आजही आमच्यामध्ये…”

“एखादा मराठी चित्रपट जर प्रदर्शित झाला तर पुढच्या आठवड्यात जाऊन आपण पाहिला पाहिजे असं प्रेक्षक विचार करतात. पण पुढच्या आठवड्यात तो मराठी चित्रपट चित्रपटगृहामध्ये नसतो. हिंदी चित्रपटांचा प्रोमो पाहिला की, प्रेक्षक म्हणतात आम्हाला हा चित्रपट बघायचा आहे. पण हेच अनुभवायची संधी आपण मराठी चित्रपटाला देत नाही. कोणीतरी एखाद्या मराठी चित्रपटाबाबत सांगितलं तरच तो चित्रपट बघायला जायचं की नाही हे प्रेक्षक ठरवतात. हिंदी चित्रपटासारखा मराठी चित्रपटाबाबत प्रेक्षक विचार करत नाहीत. हे कुठेतरी प्रेक्षकांनी बदलायला हवं. पण एखादा चित्रपट जर प्रेक्षकांना आवडला तर तो चित्रपट तुफान चालतो”.

Story img Loader