केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर मिळवलेल्या घवघवीत यशानंतर अलीकडेच चित्रपटाच्या संपूर्ण टीमने पार्टीचे आयोजन केले होते. चित्रपटाच्या अभिनेत्री, त्यांनी पडद्यावर केलेले अभिनय याशिवाय एवढा सुंदर चित्रपट कोणी लिहिला असेल? अशी चर्चा रंगली सर्वत्र रंगली आहे. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची कथा वैशाली नाईक हिने लिहिली आहे. काही दिवसांपूर्वी केदार शिंदेंनी तिचे कौतुक करत खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती.

हेही वाचा : भूमी पेडणेकरने गोव्यात सुरु केलं आलिशान KAIA रेस्टॉरंट, नावात दडलाय खास अर्थ

Akshay Kumar First Flop Film Saugandh
खिलाडी कुमारचा पहिला फ्लॉप चित्रपट तुम्हाला माहितीये का?, ९० मध्ये आपटलेला चित्रपट आता OTT वर सुपरहिट!
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
The amazing dance of young boy on the song Ashi mi Madan Manjari beats Phulwanti
व्वा रे पठ्या! “अशी मी मदन मंजिरी” गाण्यावर तरुणाचे भन्नाट नृत्य, थेट फुलवंतीला दिली टक्कर, पाहा Viral Video
kiran gaikwad new marathi movie naad the hard love movie
किरण गायकवाड लवकरच दिग्दर्शनात
CBFC suggests cuts for Kangana Ranaut’s Emergency before release
Kangana Ranaut : ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा, कंगनाने पोस्ट करत दिली ‘ही’ माहिती
Aishwarya Rai and Preity Zinta
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या राय व प्रीती झिंटाने ‘अनुपमा’फेम अभिनेत्याकडे केलेलं दुर्लक्ष; अनुभव सांगत म्हणाला…
women in the theater started making strange gestures
चित्रपट सुरू असताना भर थिएटरमध्ये महिला करू लागली विचित्र हावभाव; थरारक VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हिच्या अंगात…”
The AI dharma Story 25 October in cinemas
‘दि ए आय धर्मा स्टोरी’चे २५ ऑक्टोबरला प्रदर्शन

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची कथा कशी सुचली? याबद्दल वैशालीने अलीकडेच ‘एबीपी माझा’ दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे. वैशाली म्हणाली, “ही कथा मी माझी आई सेवानिवृत्त झाल्यावर २०१८ मध्ये लिहिली होती. माझ्या आईच्या खूप बहिणी आहेत त्यामुळे मला ही कथा सुचली. लहानपणापासून मी त्यांचे असंख्य किस्से ऐकले होते. आई मूळची गिरगावची असल्याने मला परंपरा, सण याविषयी माहिती होते. पण माझ्या आईची मंगळागौर कधीच झालेली नव्हती.”

हेही वाचा : “पंचतारांकित हॉटेलमध्ये मांडी घालून…”, अभिनेत्री नेहा पेंडसेचा मजेशीर खुलासा; म्हणाली, “नवऱ्याकडून चॉपस्टिक…”

वैशाली पुढे म्हणाली, “आईची मंगळागौर झाली नसल्याने ती नेहमी माझ्या बाबांना टोमणे मारायची. आई सेवानिवृत्त झाल्यावर तिच्यासमोर प्रश्न होता आता पुढे करायचे? आईसारख्या त्या विशिष्ट वयातील बायकांना एका काळानंतर वाटू लागते आता आपली गरज कोणालाच नाही. आईमुळे या सगळ्या गोष्टी कळत गेल्या आणि माझ्या जीवनप्रवासात मला ‘बाईपण…’ ची कथा सुचली.”

हेही वाचा : सारा अली खानने खरेदी केलं नवं ऑफिस, किंमत ऐकून नेटकरी म्हणाले, “जगाला सांगते…”

“ओमकार, केतन, निकिता यांच्याबरोबर बसून ही कथा मी पूर्ण केली. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील आई, आजी, मावशी यांचे अनुभवही या कथेत उतरले आहेत. प्रत्येकाच्या कुटुंबातील किस्से यामध्ये तुम्हाला दिसतील.” असे वैशाली नाईकने सांगितले.