मराठी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे आहेत, ज्यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान महत्वाचे मानले जाते. ज्यांच्या अभिनयाचे कौतुक केले जाते. त्यापैकी एक अभिनेता म्हणजे भरत जाधव(Bharat Jadhav) हे आहेत. आता त्यांनी एका मुलाखतीदरम्यान फक्त काही अभिनेत्यांमुळे इंडस्ट्री चालत नाही असे म्हटले आहे.

‘अल्ट्रा बझ मराठी’ या युट्यूब चॅनेलला भरत जाधव यांनी नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी नाटक आणि नवीन जे कलाकार, लेखक इंडस्ट्रीमध्ये येतात त्यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Yogita Chavan
“योगिता चव्हाण बिग बॉस आणि महाराष्ट्राला मूर्ख…”, पहिल्या पर्वातील मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
Gautam Rode Pankhuri Awasthy break up thoughts
सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”
Bigg Boss Marathi Season 5 Siddharth Jadhav Angry On Janhvi Killekar for insulted pandharinath kamble
“एकदा का तो सुटला की तुझी…”, पंढरीनाथ कांबळेबद्दल बोलणाऱ्या जान्हवीवर भडकला सिद्धार्थ जाधव, म्हणाला…
pandharinath kamble daughter grishma supports father and shared angry post on jahnavi killekar
बाबाच्या अपमानानंतर पंढरीनाथ कांबळेच्या लेकीची जान्हवीसाठी पोस्ट; म्हणाली, “त्यांच्या करिअरवर बोलण्याआधी…”
Dino Morea left movies now handling business
एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता

काय म्हणाले भरत जाधव?

या क्षेत्रातील गुरू किंवा मार्गदर्शक म्हणून काय प्रयत्न करत आहात? या प्रश्नाला उत्तर देताना भरत जाधव यांनी म्हटले, “नवीन येणारी कलाकृती चांगली असायला हवी. ती विनोदीच असावी या मताचा मी नाही. गंभीर विषय असलेली चांगली नाटकं पण तुम्ही करायला पाहिजेत. चांगले लेखक मिळायले पाहिजेत. मी ज्या नाटकात सध्या काम करतोय तो नवीनच लेखक आहे. कोणी ना कोणी नवीन असतो ते जूना होतोच.”

“आम्ही कधीतरी नवीन होतो. कोणीतरी आमच्यावर विश्वास ठेवला म्हणून आम्ही नाव करू शकलो. जेव्हा अशी मुलं समोर येतात, त्यावेळी वाटतं की नवं-जूनं काही नसतं, तर त्या गोष्टीला महत्व असतं. फक्त भरत जाधव, प्रशांत दामले म्हणून इंडस्ट्री नाही तर येणाऱ्या नवीन मुलामध्ये जर प्रतिभा असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. त्या काळात आमचेदेखील कोणीतरी स्वागत केले होते. आता आम्ही त्या टप्प्यावर आहोत, जिथे आम्ही नवीन लोकांचे स्वागत करतो. मी माझ्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, मला संकर्षण कऱ्हाडे, उमेश कामत ही सध्या नाटकात काम करणारी मुलं आहेत ती मला खूप आवडतात.”

हेही वाचा: श्रद्धा कपूरने पंतप्रधान मोदींना टाकलं मागे, सर्वाधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्स असलेली तिसरी सेलिब्रिटी; Top 2 कोण?

“चित्रपट आणि इतर ठिकाणी काम करत असतानादेखील ते नाटकात सातत्य ठेवतात. महत्वाचे म्हणजे, फक्त मुंबई-पुणे या दोनच शहरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातदेखील फिरत आहेत. ही गरज आहे. भरत जाधव किंवा प्रशांत दामले आम्ही पण मेहनतीनेच नाव मिळवले आहे. पण लोक सतत आम्हाला बघून कधीतरी कंटाळतील, तर नवीन पिढी आलीच पाहिजे. त्यामुळे इंडस्ट्री टिकेल आणि इंडस्ट्री टिकणं महत्वाचे आहे. म्हणून आमच्यासारख्या लोकांनी नवीन लोकांचे स्वागत करणेदेखील महत्वाचे आहे. हुशार असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यांची नावं झाली पाहिजेत, तर इंडस्ट्री टिकणार आहे.” असे भरत जाधव यांनी म्हटले आहे.