बालकलाकार म्हणून ज्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आणि पुढे अनेक लोकप्रिय चित्रपट आणि मालिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले, ते अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी हे होय. ‘हम बच्चे हिंदुस्तान के’ या बालचित्रपटामध्ये त्यांनी अभिनय केला होता. ‘सवतीचं कुंकू’, ‘पारख नात्यांची’, ‘मैत्री जीवांची’, ‘अथांग’, ‘ठण ठण गोपाळ’, ‘हक्क’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी काम केले. सध्या मिलिंद गवळी हे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनिरुद्ध हे पात्र साकारताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एका चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा सांगितला आहे.

पोस्ट शेअर करत काय मिलिंद गवळी?

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर ‘हौसेने केला पती’ या चित्रपटाचे शूटिंग करताना काय झाले होते, याचा किस्सा सांगितला आहे. या चित्रपटात त्यांच्याबरोबर अभिनेत्री तेजा देवकर प्रमुख भूमिकेत दिसली होती. मिलिंद गवळींनी पोस्ट शेअर करताना लिहिले, “हौसेने केला पती या सिनेमामध्ये माझ्याबरोबर हिरोईन होती तेजा देवकर. नाशिकला एका छानशा लोकेशनवर पंधरा दिवसांचं शूटिंग करून मी मुंबईला घरी परत आलो. माझ्याव्यतिरिक्त बाकीचे सीन्स शूट करण्यासाठी युनिट नाशिकमध्येच होतं. चार-पाच दिवसांनंतर मला तेजा देवकरचा नाशिकवरून फोन आला. ती घाबरली होती, खूप चिडली होती, संतापली होती. मी विचारलं, “नेमकं काय झालंय?” तर समजलं की, तेजा देवकरला नाशिकमध्येच सोडून सगळं युनिट निघून गेलं होतं. त्या सिनेमाच्या प्रोड्युसरचा काहीच पत्ता लागत नव्हता. ज्या हॉटेलमध्ये नाशिकला तिला उतरवलं होतं. त्या हॉटेलचं बिलसुद्धा त्यांनी भरलं नव्हतं. तिला काही सुचत नव्हतं काय करायचं?

Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maharashtrachi Hasyajatra fame shivali parab shares bts video of mangala movie
Video: शिवाली परबने ‘मंगला’ चित्रपटातील ‘तो’ सीन केल्यानंतर दिग्दर्शिकेने जोडलेले हात, अभिनेत्री अनुभव सांगत म्हणाली, “एका श्वासात…”
Aditya Sarpotdar
मराठी चित्रपटांनी कमाईचे आकडे दाखवणे किती गरजेचे? ‘मुंज्या’चा मराठमोळा दिग्दर्शक म्हणाला, “वाईट सिनेमांचे…”
kshitee jog
“एक झिम्मा चालला म्हणजे…”, क्षिती जोग ‘त्या’ चित्रपटाच्या अपयशावर काय म्हणाली?
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
Marathi actress Tejashri Pradhan says May I get an Oscar sometime in my life
“मला कधी तरी आयुष्यात ऑस्कर मिळो…” म्हणत तेजश्री प्रधानने सांगितली तिची हळवी जागा, म्हणाली…
Kshitee Jog
क्षिती जोगने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका का सोडलेली? अभिनेत्री म्हणाली, “खूप चुकतंय…”

“नशिबानं त्या सिनेमामध्ये माजी मंत्री बबनराव घोलप हे तेजा देवकरच्या वडिलांची भूमिका करीत होते. माझा आणि त्यांचा खूप आधीपासूनचा चांगला परिचय होताच. त्यांच्या पहिल्या सिनेमांमध्ये म्हणजे ‘नीलांबरी’ मध्ये मी नायक होतो. मी त्यांना फोन करून सगळी हकीगत सांगितली. त्यानंतर त्यांनी तेजा देवकरला मुंबईला घरी पोहोचण्यासाठी मदत केली.”

इन्स्टाग्राम

“कल्पना करा की, जे कलाकार बाहेरगावी शूटिंग करतात आणि अचानक आपल्याला काही न कळवता सगळे गायब होतात, त्या कलाकाराची अवस्था काय होत असेल? त्या सिनेमाचे दिग्दर्शक होते साताऱ्याचे दाऊद शेख. याआधी त्यांनी माझ्याबरोबर एका सिनेमामध्ये ‘सूर्योदय’मध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. मी त्यांना फोन केला, तेव्हा मला कळलं की, प्रोड्युसरकडचे पैसे संपले होते म्हणून तो पळून गेला. बरं गोष्ट इथे थांबत नाही, खरी गंमत तर काही महिन्यांनंतर झाली. एक दिवस दाऊद आणि तो प्रोड्युसर मुंबईत मला भेटायला आले. उरलेला सिनेमा आपल्याला पूर्ण करायचा आहे, असं त्यांनी मला सांगितलं.”

“मी त्यांना म्हटलं की तुम्ही तेजा देवकरच्या घरी जाऊच नका. तिची आई वकील आहे. ती तुमच्यावर केसच ठोकेल. तेजा तर हे लोक तिला परत कधी भेटतात याची वाटच बघत होती; पण तरीही मी मध्यस्थी करायचं ठरवलं. कारण- माझ्यासाठी ‘सिनेमा’ नेहमीच महत्त्वाचा होता. मी तेजाला फोन केला, सुरुवातीला ती म्हणाली, ‘त्यांच्याबरोबर परत काम करणं या जन्मात शक्य नाही.’ नंतर माझ्या विनंतीला मान देऊन, ती काम करायला तयार झाली. उरलेला सिनेमा साताऱ्यामध्ये पूर्ण केला. हा खूप कमी बजेटचा सिनेमा होता.”

“त्यानंतर मी ‘दुर्गा म्हणत्यात मला’ हा अडीच-तीन कोटींचा सिनेमा केला. त्याच्या प्रीमियरला साताऱ्याच्या पुसेगाव यात्रेला गेलो. तिथे हा ‘हौसेने केला पती’सुद्धा लागला होता आणि तो ‘दुर्गा म्हणत्यात मला’पेक्षाही तुफान चालत होता. प्रत्येक सिनेमा हे आपलं नशीब घेऊन येत असतो हे काय खोटं नाहीये.”, अशी पोस्ट लिहीत मिलिंद गवळी यांनी चित्रपटाबद्दलची आठवण सांगितली आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी अभिनेत्री तेजा देवकरला टॅग करत काही फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनिरुद्धच्या भूमिकेतूनदेखील मिलिंद गवळी यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेत अनिरुद्धची विविध रूपे प्रेक्षकांना पाहायला मिळाली. काही वर्षांपासून मनोरंजन करणारी ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Story img Loader