“नाटक हा माझा प्राण आहे,” हे वाक्य अक्षरशः जगलेल्या आणि एकेकाळी मराठी रंगभूमी आपल्या लक्षवेधी अभिनयानं गाजवणाऱ्या चतुरस्र अभिनेत्री म्हणजे भक्ती बर्वे. भूमिकेविषयी त्या अत्यंत बारकाईनं अभ्यास करायच्या. ती भूमिका किती लांब आहे, याचा त्यांनी कधीच विचार केला नाही. पण त्यांनी प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. त्यामुळे आजही म्हटले जातं, ” ‘ती फुलराणी’ पुन्हा होणे नाही.” रंगमंचावरील सम्राज्ञी, असं त्यांना ओळखलं जायचं. जरी कुठल्या विक्रमाची नोंद त्यांच्या नावे नसली तरी त्यांचं काम आजच्या कलाकारांसाठी स्फूर्तिदायक आहे. ज्यांनी मराठी रंगभूमीला एक नवा आयाम दिला होता, त्या भक्ती वर्बे कोण हे आजच्या पिढीतल्या बऱ्याच जणांना माहीतदेखील नसेल. हे मोठं दुर्दैव आहे. आज त्यांच्याविषयी फार कमी बोललं जातं. पण, आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांच्या आकाशवाणी, दूरदर्शन ते नाटक, मालिका, चित्रपट या प्रवासाविषयी जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा