नव्या संसदभवनाच्या सुरक्षाभंगाच्या मुद्द्यावरून सध्या हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजत आहे. संसदेच्या सुरक्षेच्या प्रश्नावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं अशी मागणी करुन सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या ४९ खासदारांवर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली. गेल्या तीन दिवसांत लोकसभा आणि राज्यसभेच्या १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यावर आता विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने यासंदर्भात पोस्ट शेअर करून आपलं मत मांडलं आहे.

खासदारांच्या निलंबनानंतर लोकशाहीला धाब्यावर बसवण्यात आलं आहे असं म्हणत तेजस्विनी पंडितने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टसह अभिनेत्रीने सुप्रिया सुळेंच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Mahakumbh :
Mahakumbh : महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीची एक घटना घडली की दोन? सखोल चौकशी करण्याची पोलिसांची माहिती
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Draupadi Murmu and sonia gandhi
Sonia Gandhi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या भाषणावर सोनिया गांधींची टीका, म्हणाल्या, “भाषण करताना…”
businessman attacked with sharp weapon over minor dispute near kasba ganapati temple
किरकोळ वादातून व्यावसायिकावर तीक्ष्ण शस्त्राने वार; कसबा गणपती मंदिराजवळील घटना
intra party discord seen during protest against ec organized by pune congress
काँग्रेसच्या आंदोलनात कार्यकर्ते वेठीला? शहरातील पक्षांतर्गत विसंवाद चव्हाट्यावर
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Congress MLAs praises of Haryana CM Saini
Congress : हरियाणा काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर? दोन आमदारांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Local Government Election Preparations BJP busy in front building but Congress is sluggish
भाजप मोर्चेबांधणीत व्यस्त, काँग्रेस सुस्तच! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पूर्वतयारी

हेही वाचा : स्वानंदी टिकेकरच्या लग्नाला फक्त ६ दिवस बाकी? होणाऱ्या नवऱ्याने शेअर केलेला ‘तो’ फोटो चर्चेत

“चला बिलं पास करुन घ्या पटापट, मेजॉरिटी तर आधीपासून होतीच आता तर विरोध करायला कुणी नाही…! लोकशाही बसली धाब्यावर! हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास?” असा प्रश्न अभिनेत्री तेजस्विनी पंडितने तिच्या पोस्टद्वारे उपस्थित केला आहे.

हेही वाचा : ऐश्वर्या राय की अभिषेक बच्चन, कोण चांगला अभिनय करतं? श्वेता बच्चनने दिलेलं उत्तर चर्चेत

tejaswini
तेजस्विनी पंडितची पोस्ट

दरम्यान, अभिनेत्री तेजस्विनी पंडित नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर आपलं स्पष्ट मत मांडताना दिसते. यापूर्वी तिने एक्स पोस्ट करत राज्यातील टोलनाक्यांसंर्दभात प्रश्न उपस्थित केले होते. आता खासदारांच्या निलंबनानंतर तिने केलेली ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. याशिवाय तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री नुकतीच ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात झळकली होती.

Story img Loader