झी स्टुडिओज निर्मित व अभिजित देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अभिनेता सुबोध भावे या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचा टीझर व ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाजाने या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. आता ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने राज ठाकरेंची मुलाखत घेतली.

या मुलाखतीदरम्यान राज ठाकरे यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाला आवाज देण्याचं कसं ठरलं? त्यामागचे किस्से सांगितले. यावेळी सुबोध भावेने राज ठाकरे यांना त्यांच्या नातावाबाबतही प्रश्न विचारला. या प्रश्नाला राज ठाकरे यांनी अगदी हसत उत्तर दिलं.

raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Raj Thackeray
Raj Thackeray : “अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो, पण आमच्या वाट्याला फक्त…”, राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
Raj Thackeray on chhava movie Video
Raj Thackeray: “छत्रपती संभाजी महाराजांनी कधीतरी लेझीम…”, ‘छावा’चित्रपटावर राज ठाकरेंची रोखठोक भूमिका

तुम्ही आता आजोबा झाले आहात. तर कियानला छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट तुम्हाला सांगायची असेल तर कोणती गोष्ट तुम्ही आधी सांगाल? असा प्रश्न सुबोध भावेने राज ठाकरे यांना विचारला. सुबोध भावेच्या या प्रश्नावर राज ठाकरे यांनी उत्तर देताच उपस्थितही हसू लागले.

आणखी वाचा – “…तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी सर्व चित्रपटात व्हॉईस ओव्हर द्यायला लावला”, राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

राज ठाकेर म्हणाले, “कसं आहे मुलगा असल्यामुळे त्यात ठाकरे आहे म्हणून लढायांबाबतच त्याला सांगायला लागेल असं वाटतंय. तो मोठा झाल्यावर मी त्याला मी सगळ्या गोष्टी सांगेन. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मासाहेबांनी रामायण-महाभारताच्या कथा ऐकवल्या होत्या. हेच जे संस्कार आहेत ते पुढे चालू ठेवणं ही महत्त्वाची गोष्ट आहे.”

Story img Loader