मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलेला ‘सैराट’ (Sairat) हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या काळजाच्या जवळचा विषय आहे. २९ एप्रिल २०१६ रोजी ‘सैराट’ (Sairat) प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनानंतर चित्रपटाला आठ वर्षं पूर्ण झाली असली तरीही या चित्रपटाची झिंग अजूनही कायम आहे. चित्रपटातील गाणी, संवाद, तसेच भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत. दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी (Nagraj Manjule) ‘सैराट’चं (Sairat) दिग्दर्शन केलं होतं; तर रिंकू राजगुरू आकाश ठोसर व (Rinku Rajguru and Akash Thosar) या नवोदित कलाकारांनी ‘सैराट’ (Sairat) मधून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. या चित्रपटातील परश्या व आर्ची या जोडीनं तर अवघ्या जगाला ‘याड’ लावलं होतं. अशातच आता हे दोघे प्रेक्षकांना पुन्हा एकदा ‘याड’ लावणार आहेत. कारण – ‘सैराट’ (Sairat) पुन्हा एकदा प्रदर्शित होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा