दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवा इतिहास रचला. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीमधील कमाईचे सारे विक्रम मोडले. या चित्रपटामधून आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरु, परश्याची भूमिका साकारणारा आकाश ठोसर आणि परश्याच्या मित्रांच्या भूमिकेतील अरबाज शेठ, तानाजी गालगुंडे हे चौघेही प्रकाश झोतात आले. या चित्रपटामध्ये ‘लंगड्या’ची भूमिका साकारणाऱ्या तानाजीचं तर आयुष्यच बदललं.

‘सैराट’नंतर तानाजीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्याने पुढेही काही चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तानाजीने ‘घर बंदुक बिरयानी’ या चित्रपटाच्यानिमित्ताने त्याचं आयुष्य कशाप्रकारे बदललं याबाबत भाष्य केलं. शिवाय इतर सामान्य व्यक्तींप्रमाणे तानाजीला चालत येत नव्हतं. आता त्याने स्वतःवर लाखो रुपये खर्च केला आहे.

Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Anyone embezzling in Anand Dighe's ashram should be thoroughly investigated
आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
vikram share body transformation experience
“माझे अवयव निकामी झाले असते”, अभिनेता विक्रमने सांगितला अनुभव; म्हणाला, “मी जेव्हा…”
Actor Nakul Ghanekar shares his experience of learning Kathak
Video: “नाच्या, बायल्या, छक्का म्हणायचे”, अभिनेत्याने सांगितला कथ्थक शिकतानाचा अनुभव, म्हणाला, “२० वर्षापूर्वी…”
conversion
Triple Talaq : आधी धर्मांतर, मग तीन तलाक; उत्तर प्रदेशात धर्मांतरविरोधी कायदा असतानाही कशी झाली महिलेची फसवणूक?

आणखी वाचा – “ड्रग्ज घेतो आणि…” शेखर सुमनच्या मुलाचा बॉलिवूडबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाला, “वडिलांवरील राग काढण्यासाठी मला…”

कसं बदललं तानाजी गालगुंडेचं आयुष्य?

तानाजी म्हणाला, “चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी मी शेती करत होतो. शेती करत करत मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. पण माझ्या या कामाला मर्यादा होत्या. तेच काम करत राहिलो असतो तर मी अजूनही गावातच असतो. माझी प्रगती झाली नसती. चित्रपटांमध्ये काम करत असताना माझा अवाका वाढला. सगळ्यात महत्त्वाचं मला चांगली माणसं मिळाली. टीम चांगली मिळाली. चार पुस्तकं वाचता आली. आता हळूहळू प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला आहे”.

आणखी वाचा – अशोक सराफ यांचा सख्खा भाऊ करतो ‘हे’ काम, भावावर आहे जीवापाड प्रेम, निवेदिता फोटो शेअर करत म्हणाल्या…

“माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल झाले. माझ्या पायाची एक वेगळीच गोष्ट आहे. माझ्या पायांची मी शस्त्रक्रिया करुन घेतली. शेतीचं करत राहिलो असतो तर माझे पाय कधीच नीट झाले नसते. आतापर्यंत मी आठ ते दहा लाख रुपये पायावर खर्च केले. हे सगळं श्रेय फक्त ‘सैराट’ चित्रपटाला आहे. माझे दोन्हीही पाय आता जवळपास सरळ झाले आहेत. याचाच अर्थ आर्थिकदृष्ट्याही मी सक्षम झालो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सुखकर झालो. मला पाहिजे ती गोष्ट मी करतो. अण्णांमुळे (नागराज मंजुळे) मी इथे आहे”. तानाजी आता पूर्वीपेक्षा खूपच बदलला आहे. तसेच त्याची दिवसेंदिवस प्रगती होत आहे.