मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी देशासह मुंबई व पुण्यातील वाढत्या लोकसंख्येबाबत भाष्य केलं आहे. शहरांमध्ये येणारे लोंढे आता थांबवण्याची गरज आहे, नाहीतर मुंबई कधीतरी फुटेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. आमच्या पिढीने शहराच्या विकासासाठी सुरू असलेल्या बांधकामाचा सर्वाधिक त्रास सहन केला, असंही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओ शेअर करत शरद पोंक्षे म्हणाले, “गेली ५० वर्षे मी मुंबईमध्ये राहतो. या ५० वर्षांमध्ये बदलत गेलेली मुंबई मला बघायला मिळाली. आमच्या पिढीने सर्वात जास्त त्रास सहन केला. म्हणजे विकासासाठी मुंबईची जी काम काढली जातात; रस्ते, पूल वगैरे वगैरे. आमचं सगळं आयुष्य काहीतरी बांधकाम सुरू होतं, त्यामुळे ट्रॅफिक आणि या सगळ्यांमध्ये आमचं आयुष्य गेलं. त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही. शहरांचा, देशाचा जर व्हायला हवा असेल तर मग त्रास सहन करायला पाहिजे. पण हे सगळं होत असताना मला हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य आठवतं. मला त्यांची भाषणे भयंकर आवडायची मी त्यांचा फॉलो करतो मी त्यांच्या सगळ्या शिवाजी पार्कच्या भाषणाला जायचो. १९९४-९५ च्या काळातील एका भाषणामध्ये ते असं म्हणाले होते की मुंबई मध्ये येणारे लोंढे आता थांबवायला पाहिजे. ९४-९५ नंतर येणाऱ्या लोकांना मुंबईमध्ये आता घेऊ नका, कारण एक दिवस ही मुंबई फुटेल.”

पुढे ते म्हणाले, “आता मुंबईला वाढायला जागा राहिलेली नाही, कारण चारही बाजूंनी समुद्र आहे. मुळात ब्रिटिशांनी सात बेटं एकमेकांमध्ये भरती करून त्याला मुंबई नावाचं शहर बनवलं गेलं मोठं आणि नंतर मग बांद्रापर्यंत ते वाढलं आणि आता उपनगरं वाढत वाढत ते पार पालघरपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. आणि दुसरीकडे पार डोंबिवली आणि बदलापूर इथपर्यंत जाऊन पोहोचलं आहे.”

पुढे पोंक्षे म्हणाले, “मला डोक्यामध्ये विचार येतात की सगळ्या बेटांच्या मध्ये भराव घालून ही मुंबई मोठी केलेली आहे आणि आता ज्या पद्धतीने मुंबईमध्ये जे टॉवर्स उभे राहतात ते टॉवर्स बघून भयानक भीती वाटते. खरच सांगतो हे कुठे थांबणार आहे का? म्हणजे एकाही राजकीय नेत्याला किंवा राजकीय पक्षाला असं कधी वाटत नाही का की फक्त विकासाची काम करणं हा एकमेव उपाय नाहीये मुंबई पुणे अशा शहरात मधला. सगळ्यात मोठा उपाय आहे तो या शहरांमध्ये येणारे लोंढे थांबवणं. हा त्याच्यावरचा उपाय आहे. शेवटी प्रत्येक शहराची, प्रत्येक राज्याची, प्रत्येक देशाची संसाधन पुरवण्याची क्षमता असते. समाज लोक एकत्र राहतात त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, पाणी आणि सगळ्यात सोयी सुविधा म्हणजे वीज, चांगली घर, चांगले रस्ते चांगले फुटपाथ सगळ्या प्रकारच्या सुख सोयी चांगले मार्केट, चांगलं भाजी मार्केट चांगले मॉल्स असे सगळ्या गोष्टी असतात. हे शहर शेवटी फुटणार आहे, हे खरंच कधीच थांबणार आहे?”

उंच इमारतीतून खाली बघताना दडपण येतं – शरद पोंक्षे

“उंच इमारती बांधल्या जातायत, दडपण येतं. ३५-४० व्या मजल्यावरच्या खिडकीतून बघताना भीती वाटते खरं सांगतो. ही भयाण मुंबई, आता पुणेही त्याच मार्गावर आहे. याच्यावर काही उपाय नाही का शोधून काढता येणार? जो उठतो तो मुंबई-पुण्यासारख्या शहरात येतो. काय बाळासाहेबांची दूरदृष्टी असेल. १९९५ मध्ये ते म्हणाले होते की आता मुंबईतील लोंढे थांबवण्याची गरज आहे. ते तर म्हणाले होते की १९९५ आधीच्या झोडप्या नक्की करा, त्याच्यानंतर आता एकही झोपडी होऊ देऊ नका. आजही झोपड्या नव्याने बांधल्या जातात, मग इथले काहीतरी आमदार खासदार केवळ मतांच्या राजकारणासाठी त्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या अनधिकृत लोकांना अधिकृत बनवतात. त्यांना आधार कार्ड दिली जातात. त्यांना मीटर दिले जातात. हे कुठेतरी थांबवायला पाहिजे, असं कोणत्याच राजकीय पक्षाच्या मनात का येत नाही? कसं पुरवणार आहोत सगळं? कचऱ्याचं नियोजन कसं करणार आहोत आपण, पाणी कसं पुरवणार आहोत? खालीही खोदणार तर किती? आता वांद्रे ते नरिमन पॉइंटपर्यंत संपूर्ण अंडरग्राउंड मेट्रो झालीये. मला भीती वाटते काही अंतरावर समुद्राचं पाणी आहे. तो काला पत्थर सिनेमा आठवतो मला कुदळ मारता मारता एक एक थेंब यायला सुरुवात झाली आणि काय झालं त्या सिनेमांमध्ये बघितलं ना. कधीतरी या मुंबईचं असं काहीतरी होऊ शकतं,” असं शरद पोंक्षे म्हणाले.

मुंबई एक दिवस फुटेल – शरद पोंक्षे

“तीन- साडेतीन कोटींच्या वर गेली मुंबई. आमच्या पिढीच्या डोळ्यासमोर एक कोटी वरून तीन कोटीच्या पुढे लोकसंख्या गेली. देशाची तीच अवस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा २०१४ ला निवडून आले तेव्हा ते सव्वाशे कोटी भारतीय म्हणायचे, आता १४० कोटी भारतीय म्हणतात. मग हे जे १५ कोटी वाढलेत हे काय आहे? आपण परदेशामध्ये जातो, परदेशांमधलं सगळं बघतो तेव्हा आपल्याला अद्भुत वाटतं की कसं सुंदर नियोजन आहे. आपल्या शेजारचा मुस्लीम देश युएई. तिथे सगळं किती सुंदर आहे. हे सगळं कसं शक्य आहे तर त्यांचा लोकसंख्येवर प्रचंड कंट्रोल आहे. एकट्या मुंबईच्या अर्धी लोकसंख्या अख्ख्या जपान राष्ट्राची आहे. आपल्यापेक्षा दुप्पट-तिप्पट अमेरिकेचं क्षेत्रफळ आहे आणि माणसं एक चतुर्थांश आहे. आणि आपली १४० कोटी. माझ्या वाचनात आलं की १९४७ साली जे मुसलमान काँग्रेसच्या कृपेने इथे राहिले ते तीन कोटी होते. ७८ वर्षात ते ३० कोटी झाले. जवळपास १० टक्क्यांनी वाढले. त्यांची जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा काय होतं? आता काही महिन्यानंतर बांगलादेशमध्ये पाहिलं ना ते घडतं. माझ्या राजकीय राजकारण करणाऱ्या सर्व राजकीय पक्षाच्या नेतृत्वांना कळकळीची विनंती आहे हे मुंबई पुण्यासारखे शहरातले लोंढे आता थांबवा. थांबवण्याची फार गरज आहे. ही मुंबई एक दिवस फुटेल,” असं शरद पोंक्षे म्हणाले.