शरद पोंक्षे त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्या व्याख्यानामुळेही चर्चेत असतात. त्यांची नुकतीच दिलेली एक मुलाखत चांगलीच गाजत आहे. या मुलाखतीत त्यांनी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाबद्दल सांगितलं आहे. नाटकाला विरोध झाला, तत्कालीन केंद्र सरकारने त्यावर बंदी घातली, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आपल्यासाठी उभे राहिले होते, असं शरद पोंक्षेंनी सांगितलं. ‘गप्पा मस्ती’ या पॉडकास्टने त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

भगवद्गीता की संविधान? शरद पोंक्षे म्हणाले, “क्षणाचाही विलंब न करता मी…”

rakesh roshan
“वाईट बातमी…”, गोळीबाराच्या घटनेनंतरही राकेश रोशन यांना हृतिकसाठी अंडरवर्ल्डमधून यायचे धमक्यांचे फोन; खुलासा करत म्हणाले…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Shashank Ketkar Welcomes Baby Girl
मुलगी झाली हो! शशांक केतकर दुसऱ्यांदा झाला बाबा, लेकीचं नाव ठेवलंय खूपच खास; म्हणाला, “घरात लक्ष्मी…”
Ajit Pawar avoided to sitting next to sharad pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “माझा आवाज…”
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”
Chhagan Bhujbal On Ajit Pawar
Chhagan Bhujbal : अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कुणी रचलं? भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले, “शरद पवार अन् खर्गेंचा वाद…”
What Ajit Pawar Said About Saif Ali Khan
Ajit Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्याचा घटनाक्रम सांगत अजित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, “नवा मुद्दा आला की..”

शरद पोंक्षे म्हणाले, “चालू नाटकात १००-१५० माणसं अचानक दरवाजे उघडायचे आणि काँग्रेसची १००-१५० माणसं घुसायची हे अनेक वेळा घडलंय. ते स्टेजवर यायचे, मला घेराव घालायचे, माझ्या तोंडाजवळ येऊन ‘मारेन तुला’ म्हणत खूप गलिच्छ शिव्या द्यायचे. नंतर नाटकातील लोक मला तिथून आत बोलवायचे, ‘ते तुला मारतील’ असं म्हणायचे. मी म्हणायचो कोणी मारत नाही मला. ते इथपर्यंत येऊन जाणार, त्यांच्या कुणाची हिंमत नाही मला मारायची.”

“बौद्ध, जैन, लिंगायत, शीख सगळे हिंदूच आहेत”, शरद पोंक्षेंचे वक्तव्य; म्हणाले, “गौतम बुद्ध…”

पुढे ते म्हणाले, “जेव्हा जेव्हा निवडणुका व्हायच्या, तेव्हा तेव्हा नाटकाला विरोध व्हायचा. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक मुद्दा असायचा की नथुरामच्या प्रयोगाला आम्ही विरोध केला. पण कुणालाच काही माहीत नाही, आपल्याकडे इतिहासाबद्दल शून्य माहिती आहे, वाचन तर नाहीच आहे. त्यामुळे फक्त विरोधासाठी विरोध करत राहायचं इतकंच. नंतर केंद्र सरकारने नाटकावर बंदी घातली, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे उभे राहिले. ‘नथुराम हा देशभक्तच आहे, नथुराम महाराष्ट्रात बोललाच पाहिजे,’ हे ते भाषणातही बोलले होते. ते बाळासाहेब ठाकरे होते, तो करिश्माच वेगळा होता. कारण माझ्याकडे कोणती संघटना नाही, माझ्या पाठिशी कोणी नव्हतं, फक्त बाळासाहेबांची तेव्हाची खरी शिवसेना होती, तीच होती.”

Story img Loader