‘वादळवाट’, ‘अवंतिका’, ‘अवघाची संसार’ या मालिकांमुळे अभिनेत्री श्वेता शिंदे घराघरांत लोकप्रिय झाली. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये अभिनेत्रीने आपला ठसा उमटवला आहे. अभिनयात जम बसल्यावर श्वेता पुढे निर्मिती क्षेत्राकडे वळली. ‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ अशा गाजलेल्या मालिकांची निर्मिती तिने केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्वेताने तिचं बालपण, कॉलेज, अभिनेत्री ते निर्माती असा संपूर्ण प्रवास उलगडला आहे.

साताऱ्याहून उच्च शिक्षणासाठी श्वेता मुंबईत आली. मिठीबाई कॉलेजमधून तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली. इंडस्ट्रीत कोणाचंही पाठबळ नसताना मेहनत करून श्वेताने एवढा मोठा यशाचा पल्ला गाठला. यादरम्यान इंडस्ट्रीत आलेल्या अनुभवांविषयी तिने नुकत्याच महाएमटीबीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ मालिका महाराष्ट्रात पुन्हा नंबर १! टीआरपीत मारली बाजी, सायली-अर्जुनने शेअर केली खास पोस्ट

श्वेता म्हणाली, “मला या इंडस्ट्रीत अनेक लोकांकडून विविध गोष्टी शिकता आल्या. मी एका नाटकात अशोक सराफ यांच्याबरोबर काम करत होते. मला त्यांच्याबरोबर काम करून अनेक गोष्टी शिकता आल्या. जसं की, तुमच्याकडे केवळ टॅलेंट असून उपयोग नाही. तुमच्या टॅलेंटला मेहनत आणि शिस्त याची जोड असणं गरजेचं आहे.”

हेही वाचा : “सहा महिन्यांपूर्वी आई सोडून गेली…”, ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाण लग्नात झालेली भावुक, सौरभबरोबरच्या नात्याबद्दल म्हणाली…

“मी सेटवर नेहमीच वेळेवर पोहोचते. पण अशोक सराफ यांच्याबरोबर काम करून मी नेहमी वेळेच्या ५ मिनिटं आधी कामावर कसं पोहोचायचं, पाच मिनिटंही उशिरा जायचं नाही या गोष्टी शिकले. चारच्या तालमीला ते बरोबर चारला पाच मिनिटं कमी असताना यायचे. पण, कधीही त्यांना उशीर झाला नाही. मुंबईत वाहतूक कोंडी असणारच आहे त्यामुळे तुम्ही नेहमी ते गृहित धरूनच आपल्या कामाचं नियोजन केलं पाहिजे असं ते कायम सांगतात.” असं श्वेता शिंदेने सांगितलं.

Story img Loader