मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. अल्पशा आजाराने त्यांनी ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील निवासस्थानापासून सकाळी साडेअकरा वाजता अंत्ययात्रेस सुरुवात होणार आहे.

भालचंद्र कुलकर्णी यांचं मराठी सिनेमातील योगदान मोठं आहे, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. ‘झुंज तुझी माझी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’, ‘जावयाची जात’, अशा ३०० पेक्षा चित्रपटांत त्यांनी काम केले होते. १९८४ साली आलेल्या ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे खूपच लोकप्रिय झाले होते.

actress resham tipnis children doing jobs
अभिनेत्री रेशम टिपणीसची मुलं काय काम करतात? अभिनेत्री म्हणाली, “मुलगा ग्राफिक्स डिझायनर, तर मुलगी…”
Ishq Vishk Rebound movie directed by Nipun Avinash Dharmadhikari
मैत्री आणि प्रेमाचा जांगडगुत्ता
Pandit Hridaynath Mangeshkar, Shivacharitra Ek Soneri Paan, Shivacharitra Ek Soneri Paan Song on launch, Pandit Hridaynath Mangeshkar Launches Shivacharitra Ek Soneri Paan, 350th Shivrajyabhishek Day,
दीदीची उणीव सतत भासते – हृदयनाथ मंगेशकर, ‘शिवचरित्र-एक सोनेरी पान’ या गीताचे मंगेशकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण
ishq vishk rebound actor rohit saraf Talk with loksatta about role in film
प्रयोगशीलतेतून उत्तम कलाकृती साधते’
sonalee kulkarni praised priya bapat and umesh kamat jar tarchi goshta play
सोनाली कुलकर्णीने पाहिलं प्रिया-उमेशचं नवं नाटक ‘जर तरची गोष्ट’; प्रतिक्रिया देत म्हणाली, “आजच्या काळातलं…”
sharad pawar on theatres responsibility
नाटयगृहांवरील कर, देखभालीची जबाबदारी सरकारची ; शरद पवार यांचे मत
bai ga movie first song Jantar Mantar Bai Ga
Video : “जंतर मंतर बाई गं…”, सहा अभिनेत्री अन् एक हिरो! ‘बाई गं’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
nana patekar s son malhar patekar at rss
अभिनेते नाना पाटेकर पुत्र मल्हारची संघाच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती, काय होते औचित्य

Oscar मध्ये राम चरण व ज्युनिअर एनटीआरने नाटू नाटूवर डान्स का केला नाही? अभिनेता खुलासा करत म्हणाला, “त्यांनी आम्हाला…”

भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक होते. चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘ब्रँड कोल्हापूर’च्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. हा त्यांचा अखेरचा पुरस्कार ठरला.

चित्रपट महामंडळाच्या सांस्कृतिक, चित्रपट विषयक तसेच आंदोलनात्मक कामातही ते सक्रिय होते. शालिनी, जयप्रभा स्टुडिओचे जतन व्हावे, या लढ्यात ते अग्रभागी होते. त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून ही काम केले होते.