ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं १५ जुलै रोजी निधन झालं. पुणे जिल्ह्यातील आंबी गावात बंद फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं, त्यानंतर त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्यांचा मुलगा गश्मीर तिथे पोहोचला. त्याच दिवशी सायंकाळी त्यांच्यावर पुण्यातील नवी पेठेत अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा – पत्नी, मुलगा, सून अन्…, असं आहे रवींद्र महाजनींचं कुटुंब

when Aishwarya Rai got injured on the sets of Khakee
अभिषेकशी लग्न होण्याआधी ऐश्वर्या रायचा अपघात पाहून अमिताभ बच्चन यांची झालेली ‘अशी’ अवस्था; म्हणालेले, “मी तिच्या आईला…”
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
nashik mahatma phule shudra word
फुले दाम्पत्याच्या स्मारकातील शिलालेखात त्रुटी, ओळींमधून ‘शुद्र’ गायब
Mithun Chakraborty
“नक्षलवादीचा शिक्का…” मिथुन चक्रवर्तींनी स्वत:च्या जीवनसंघर्षावर केलेले वक्तव्य; म्हणालेले, “असा एक क्षण आला, जेव्हा आयुष्य…”
Simi Garewal slams trolls defends Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन मुलगी अन् सून ऐश्वर्या राय यांच्यात भेदभाव करतात? ‘त्या’ व्हिडीओवर दिग्गज अभिनेत्री कमेंट करत म्हणाली…
Success Story of Aadithyan Rajesh at the age of 13 he built the company named Trinet Solutions and launched an app
लहानपणीच केलं अ‍ॅप लॉंच अन् वयाच्या १३व्या वर्षी झाला कंपनीचा मालक; वाचा आदित्यन राजेशचा उल्लेखनीय प्रवास
Prabhatai, Hariprasad Chaurasia, Prabhatai Atre,
संगीत हेच प्रभाताईंचे पहिले प्रेम, पं. हरिप्रसाद चौरासिया यांची भावना
Aishwaraya Narkar
Video: “खूप भारी दिसते तू…”, सूरज चव्हाणचा डायलॉग आणि ‘सैराट’ चित्रपटातील गाणं ऐश्वर्या नारकरांच्या व्हिडीओनं नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष

रवींद्र महाजनी हे मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात देखणे अभिनेते म्हणून ओळखले जातात, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचे असंख्य चाहते आहेत. रवींद्र यांचं चौकोनी कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी माधवी, मुलगा गश्मीर व मुलगी रश्मी आहेत. त्यांच्या मुलाबद्दल सर्वांनाच माहीत आहे, तो प्रसिद्ध अभिनेता आहे, पण त्यांची मुलगी अभिनयसृष्टीच्या झगमगाटापासून दूर आहे.

गश्मीरची बहीण रश्मी विवाहीत आहे. ती गश्मीरपेक्षा १३ वर्षांनी मोठी आहे. तीन वर्षांपूर्वी रक्षा बंधनाच्या दिवशी गश्मीरने बहिणीसाठी केलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. “माझी बहीण, माझ्याहून १३ वर्षांनी मोठी. माझी छोटी आईच ती! K.G. पासून ते पाचवी पर्यंत – माझा डब्बा भरणे, मला शाळेसाठी तयार करणे, मला तिच्या कायनेटिक होंडा वरुन शाळेत सोडणे – तिनेच केले. हिरो होण्याकरता मला सिनेसृष्टीत येण्याची गरज नव्हती. जन्मापासूनच मी तिचा स्टार होतो. माझ्या चित्रपटांना यश मिळो वा न मिळो, माझी एक फॅन निश्चितच माझ्या पाठीशी कायम उभी असेल कारण तिचं प्रेम आणि तिची निष्ठा परिस्थितीनुसार बदलत नाही. म्हणूनच नैराश्य माझ्या आसपासही भटकत नाही. स्वामी म्हणतात “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” .. अर्थात, ते कुणाच्या रुपाने माझ्या पाठीशी उभे आहेत हे तुम्हाला समजलेच असेल,” असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

दरम्यान, गश्मीरचेही लग्न झाले आहे. त्याच्या पत्नीचे नाव गौरी देशमुख आहे, त्यांना एक मुलगाही आहे. गश्मीर पत्नी, मुलगा व आईबरोबर मुंबईत राहतो, तर रवींद्र महाजनी गेल्या आठ महिन्यांपासून आंबी गावात राहत होते.