दिवाळी भाऊबीजेच्या मुहूर्तावर न्यूझीलंड संघाचा ७० धावांनी पराभव करत भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता १९ नोव्हेंबरला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. २००३ च्या विश्वचषकानंतर आता पुन्हा एकदा तब्बल २० वर्षांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा अंतिम सामना रंगणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसमाने येणार आहेत. यापूर्वी २००३ मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा तब्बल २० वर्षांनी टीम इंडियाची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. आता या अंतिम सामन्याबाबत सिनेविश्वातील कलाकारांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘झिम्मा २’ फेम अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने नुकत्याच रेडिओ सिटी मराठीला दिलेल्या मुलाखतीत विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबाबत आपलं मत मांडलं आहे.

batsman jemima rodrigues on t20 world cup
जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी परिस्थितीनुसार खेळणे आवश्यक! ट्वेन्टी२० विश्वचषकाबाबत जेमिमाचे मत
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Sanjay Manjrekar on Mohammed Shami for Border Gavaskar Trophy
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी मोहम्मद शमी फिट नसेल तर ‘हा’ गोलंदाज उत्तम पर्याय; संजय मांजरेकरांचं वक्तव्य
Try to keep him in his crease says Nathan Lyon on Rishabh Pant
‘…षटकारांची भीती वाटत नाही’, ऋषभ पंतबद्दल बोलताना नॅथन लॉयन काय म्हणाला?
India grandmaster chess player D Gukesh expressed that he did not even think about it during the chess Olympiad sport news
ऑलिम्पियाड स्पर्धेदरम्यान जगज्जेतेपदाच्या लढतीचा विचारही नाही -गुकेश
Chess Olympiad Competition Indian men and women teams win gold sport news
दोन दशकांची प्रतीक्षा संपल्याचा आनंद! बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतील सुवर्णयशानंतर द्रोणावल्ली हरिकाची भावना
Virat Kohli chanted om namah shivay Gautam Gambhir listened Hanuman Chalisa
कोहलीने कोणत्या सीरिजमध्ये प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नम: शिवाय म्हटलं? गंभीरसाठी हनुमान चालिसा कशी ठरली किमयागार?
IND vs BAN Rohit Sharma on KL Rahul and Sarfaraz Khan ahead 1st Test match
IND vs BAN : केएल राहुल की सर्फराझ खान? रोहित शर्माने केले स्पष्ट; ‘या’ खेळाडूला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी

हेही वाचा : Video : ट्रॅफिकमध्ये अडकल्या मिसेस उपमुख्यमंत्री, वेळ घालवण्यासाठी गाडीत केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले…

“टीम इंडियाकडून माझी एवढीच इच्छा आहे की, त्या ऑस्ट्रेलियाची अशी चेचा (वाट लावा) ना…२००३ चा बदला आपण काही केल्या घेतला पाहिजे! ऑस्ट्रेलियाची टीम पुन्हा भारतात आली नाही तरी हरकत नाही. त्यांना एकदाच धुड्डूssम करून टाका. ऑस्ट्रेलियाची टीम अंतिम सामन्यात दाखल झाली याचा खरंतर मला प्रचंड आनंद आहे. त्यांची टीम खरंच टफ आहे यात काही शंका नाही. पण, सध्या आपली टीम खूपच भारी क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे आपल्या टीमने ऑस्ट्रेलियाला हरवलंच पाहिजे.” अशी इच्छा सिद्धार्थ चांदेकरने व्यक्त केली आहे.

हेही वाचा : “यंदाचा वर्ल्डकप…”, ‘टायगर ३’ चित्रपटाच्या कार्यक्रमात सलमान खानचे भाकित, म्हणाला…

सिद्धार्थ चांदेकरप्रमाणे गायक सलील कुलकर्णी, झिम्माचा दिग्दर्शक हेमंत ढोमे, गौरव मालनकर, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, सायली संजीव, अमृता खानविलकर अशा अनेक कलाकारांनी भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.