नशीब कुणीही बदलू शकत नाही. एखादी गोष्ट जी तुमच्या नशिबात असेल तर ती तुम्हाला मिळतेच. आज प्रयोगांचे शतक झळकवणाऱ्या ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकाचीही गोष्ट अशीच काहीशी. लेखक शेखर ढवळीकर यांनी हे नाटक दिग्दर्शक मंगेश कदम यांना ऐकवलं. त्यांना ते आवडलं. हे नाटक आपण पत्नी लीना भागवतसह करायचं असं मंगेश यांनी ठरवलंही. पण काही दिवसांत ज्येष्ठ रंगकर्मी विक्रम गोखले यांनीही ही संहिता ऐकली. त्यांनाही ती आवडली. आणि हे नाटक आपण करावं, असं त्यांना वाटलं. त्यांनी आपली ही इच्छा मंगेश यांना बोलून दाखवली. कुठेही हिरमोड न करता मंगेश विक्रम गोखलेंबरोबर हे नाटक करायला तयार झाले. विक्रम गोखले यांच्याबरोबर रिमा यांच्या अभिनयाने नटलेलं हे नाटक रंगभूमीवर आलं. काही प्रयोगांनंतर विक्रम गोखले यांना आवाजाचा त्रास जाणवायला लागला आणि यापुढे नाटक न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण नाटक एवढं दर्जेदार होतं की, ते बंद पडू नये अशी त्यांचीही इच्छा होती. त्यांनी मंगेश यांना बोलावलं आणि सांगितलं की, ‘मी तर आता हे नाटक करू शकत नाही, पण नाटक बंद पडू नये, असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही आणि तुमची पत्नी लीना यांनी नाटकातील मुख्य भूमिका कराव्यात’. आणि अशा पद्धतीने हे नाटक अखेर या जोडीच्या आयुष्यात आलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा