गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांवर आधारित मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘टाइमपास ३’, ‘पावनखिंड’, ‘धर्मवीर’, ‘चंद्रमुखी’, ‘सरसेनापती हंबीरराव’ यांसारखे विविध चित्रपट प्रदर्शित झाले. आता शुक्रवारी १९ ऑगस्टला ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘चुकीला माफी नाही’ यांसारखे अनेक सुपरहिट डायलॉग असलेला ‘दगडी चाळ’ हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘दगडी चाळ २’च्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने लोकसत्ता ऑनलाईनच्या ‘डिजीटल अड्डा’ला हजेरी लावली. यावेळी अभिनेते मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत हे कलाकार उपस्थित होते.

आणखी वाचा – काही वर्ष अफेअर, २५ वर्षांचा संसार अन्…; पडत्या काळात समीर चौगुलेला मिळाली पत्नीची साथ

stranger murder in bharati vidyapeeth premises
भारती विद्यापीठ परिसरात अनोळखी व्यक्तीचा खून
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Sangameshwar leopard story in marathi
संगमेश्वर हातीव येथे बिबट्या मृतावस्थेत आढळला
What Anna Hajare Said?
Anna Hazare Emotional : अरविंद केजरीवाल यांच्या पराभवानंतर अण्णा हजारे रडले; “तुमच्यावर इतकं प्रेम केलं, पण..”
chhaava movie marathi writer kshitij patwardhan writes aaya re toofan song
मराठमोळ्या लेखकाने लिहिलंय ‘छावा’ सिनेमाचं गाणं! ए आर रेहमानसह पहिल्यांदाच एकत्र काम; म्हणाला, “शब्दरूपी सेवा…”
Santosh Juvekar
“जर माझं प्रेम असेल…”, अभिनेता संतोष जुवेकरला ‘अशी’ पाहिजे आयुष्याची जोडीदार; म्हणाला…
shirish more suicide letters
शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिल्या चार चिठ्ठ्या
sant Tukaram maharaj suicide news in marathi
देहूत जगद्गुरू संत तुकोबांच्या वंशजाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी

‘दगडी चाळ २’ चित्रपट कसा घडला?, पडद्यामागचे किस्से याबाबत अनेक गप्पा रंगल्या. यावेळी अभिनेता अंकुश चौधरीला लालबाग-परळच्या चाळींमधील गंमती-जमती याबाबत विचारण्यात आलं. यावेळी तो अगदी खुलेपणाने बोलला. त्याचबरोबरीने त्याला बालपणापासून तो राहत असलेल्या चाळीमध्ये पहिलं प्रेम मिळालं का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर अंकुशने दिलेलं उत्तर थक्क करणारं होतं.

अंकुश म्हणाला, “मी शाळेत होतो. त्यावेळी यालाच प्रेम म्हणतात का? हे देखील मला कळत नव्हतं. मला त्यादरम्यान एक मुलगी आवडायला लागली होती. जसं मित्रांमध्ये असतं ना तुला कोणती मुलगी आवडते? तसंच मला देखील मित्रांनी विचारलं तुला कोणती मुलगी आवडते? तेव्हा मी त्या व्यक्तीचं नाव सांगितलं.

“पाचवी इयत्ते पूर्वीची ही गोष्ट आहे. पण त्यानंतर त्या मुलीचं आणि माझं बोलणं देखील झालं नाही. पण काही वर्षानंतर तिचा अपघात झाला आणि त्यामध्येच तिचं निधन झालं. ही गोष्ट आयुष्यभर लक्षात राहील. माझं पहिलं प्रेम म्हणजे ते असं होतं.” अंकुशच्या ही गोष्ट कायम लक्षात राहणारी आहे.

Story img Loader