बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची क्रेझ अद्याप कायम आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी नागराज मंजुळे यांनी या चित्रपटातील कलाकारांची कास्टिंग कशी झाली, याबाबतचे किस्से सांगितले होते. यावेळी त्यांनी ‘भावना भाभी’ या पात्राबद्दलही सांगितले.

झुंड या चित्रपटात भावना भाभी हे पात्र सायली पाटील हिने साकारले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एबीपी माझा ला दिलेल्या मुलाखतीत या कलाकारांच्या कास्टिंगबद्दलची माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, “सायली ही सैराटच्या ऑडिशनसाठी आली होती. त्यावेळी तिनं चांगल काम केलं होतं. पण तिची निवड झाली नाही.”

What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
santosh juvekar reveals his experience to working with vicky kaushal in chhaava
“माझी सुट्टी होती, विकीने अचानक सेटवर बोलावून घेतलं अन्…”, संतोष जुवेकरने सांगितला ‘छावा’च्या सेटवरचा अनुभव, म्हणाला…
Pankaja Munde on Dhananjay Munde
“धनंजय मुंडे फडणवीस-पवारांचे खास, राजीनामा मागणार नाहीत”, क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर; म्हणाल्या…
Akshay Kumar
“स्टंट पाहून दिग्दर्शक घाबरून पळून गेले…”, अक्षय कुमारने सांगितला २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा रंजक किस्सा
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”

“सायली ही फार चांगली कलाकार आहे. ज्यावेळी मी या चित्रपटातील भावना ही भूमिका लिहित होतो, त्यावेळी मला सायली ही भूमिका चांगल्याप्रकारे करेल असे वाटले होते. त्यानंतर मी सायलीला फोन केला. त्यावेळी तिला चित्रपटाबद्दल सांगितले. पण तिला यावर विश्वासच बसत नव्हता.” असे नागराज मंजुळेंनी सांगितले.

यानंतर सायली म्हणाली, “मी सैराट चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. पण तेव्हा माझी निवड झाली नव्हती. त्यानंतर अचानक एक दिवशी मला झुंडसाठी नागराज मंजुळे यांचा फोन आला. त्यावेळी त्यांनी मला फोन केला, यावर मला विश्वासच बसत नव्हता.”

“तेव्हा ते म्हणाले की मी नागराज मंजुळे बोलतो. तेव्हा मी माझ्या मनात म्हणाले, मग मी ऐश्वर्या राय बोलते. मला खरंच वाटतं नव्हतं की नागराज सरांनी मला फोन केला. मला वाटलं माझे मित्र माझ्यासोबत थट्टा मस्करी करत आहेत. त्यानंतर मी नागराज सरांना भेटायला गेले, तेव्हा त्यांनी मला चित्रपटाबद्दल सांगितलं. त्यांना पाहून मी थक्क झाले होते. त्यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन हे या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत, असेही सांगितले. यानंतर मात्र मला फार भारी वाटलं. आता स्वत:ला पाहून फार छान वाटत आहे.”

दरम्यान ‘झुंड’ या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ६.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.५० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर शनिवारी २. १० कोटी आणि रविवारी २.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

Story img Loader