गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री म्हणून निवेदिता सराफ ओळखल्या जातात. चित्रपट तसेच टेलिव्हिजन क्षेत्रातही त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतून पुन्हा टेलिव्हिजनवर झळकल्या आहेत अन् यातील त्यांचं कामही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं आहे. त्याबरोबरच त्या ‘मी स्वरा आणि ते दोघे’ या नाटकातही काम करत आहेत.

नुकतीच निवेदिता यांनी सिनेपत्रकार सौमित्र पोटे याच्या ‘मित्र म्हणे’ पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये आजवर कित्येक सेलिब्रिटीजनी हजेरी लावून मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. आता निविदीता सराफ यांनी या कार्यक्रमात हजेरी लावून मुलाखतीदरम्यान त्यांचे मनोरंजन क्षेत्रातील काम करण्याचे अनुभव, रंगभूमी व नाटकाविषयी एकूणच निर्माण झालेली अनास्था यावर भाष्य केलं आहे.

Aditya Thackeray
नवी मुंबई विमानतळावरील चाचणीवरून आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “वायुदलाचा वेळ अन्…”
ratan tata dinner with workers
जेव्हा रतन टाटा पिंपरीतील कामगारांसोबत जेवण करतात…ताटही स्वतः…
farmers create chaos in krishi awards ceremony
कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात गोंधळ; फेटे उडवून शेतकऱ्यांकडून निषेध
praful patel on raj thackeray ladki bahin statement
राज ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “ज्या लोकांना सरकारची…”
arvind sawant replied to chandrasekhar bawankule
“उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे” म्हणणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…
gulabrao patil on sanjay raut
Gulabrao Patil: “संजय राऊत अपना माल, अन् उद्धव ठाकरे…” गुलाबराव पाटलांची टोलेबाजी
when jaya bachchan father talked about amitabh bachchan accident
अमिताभ बच्चन यांना जीवघेण्या अपघातातून वाचवणाऱ्या डॉक्टरांना पुरेसं श्रेय दिलं नाही, त्यांच्या सासऱ्यांनी केलेलं वक्तव्य
jayant patil appeal bachchu kadu
Jayant Patil : राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु असतानाच जयंत पाटलांचे बच्चू कडूंना आवाहन; म्हणाले…

आणखी वाचा : पाच महीने उलटून गेले तरी ‘द केरला स्टोरी’ अद्याप OTT वर प्रदर्शित का झालेला नाही? जाणून घ्या

याच मुलाखतीमध्ये निवेदिता यांनी ज्येष्ठ अभिनेत्रींना काम न मिळण्याबद्दलही भाष्य केलं आहे. नुकतंच हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. संपूर्ण देशासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. यावरच निवेदिता सराफ यांनी वक्तव्य केलं आहे. केवळ पुरस्कार देऊन चालणार नाही त्यांना कामही मिळायला हवं असं मत त्यांनी या पॉडकास्टमध्ये मांडलं.

याविषयी बोलताना निवेदिता सराफ म्हणाल्या, “तुम्ही वहिदा रेहमान यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं, पण एवढ्यावरच ते थांबायला नको. त्यांना चित्रपटात भूमिका मिळायला हव्या. त्यांना केवळ एक पुरस्कार देऊन कोपऱ्यात बसवून ठेवणं योग्य नाही.” याबरोबरच निवेदिता यांनी बऱ्याच विषयांवर भाष्य केलं. नाटक आणि रंगभूमीसाठी नेमके कोणते बदल घडणं अपेक्षित आहे यावरही त्यांनी भाष्य केलं.