बिग बॉस ओटीटीचे तिसरे पर्व सध्या विविध कारणांमुळे गाजत आहे. दिग्गज अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. बिग बॉस ओटीटीच्या या तिसऱ्या पर्वाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बिग बॉसने स्पर्धकांना दिलेल्या टास्कमुळे, कधी घरातील सदस्यांच्या भांडणामुळे, तर कधी घरातील सदस्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे हे पर्व चर्चेत असल्याचे दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाला रणवीर शौरी?

आता अभिनेता रणवीर शौरीने केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे. त्याने अरमान मलिकजवळ आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. अरमान मलिकबरोबर बोलताना त्याने म्हटले, “मला बिग बॉस विजेत्याची ट्रॉफी नको आहे, मला त्याबरोबर मिळणाऱ्या रकमेची गरज आहे. २५ लाख रुपये मला मिळणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे”, असे रणवीर शौरीने अरमान मलिकबरोबर बोलताना म्हटले आहे. दरम्यान, रणवीर शौरी नुकताच बिग बॉसच्या घराचा नवीन प्रमुख बनला असून त्याबरोबर मिळणाऱ्या विशेषाधिकारांचा आनंद घेताना दिसत आहे. याआधीदेखील रणवीर शौरीने माझ्याकडे इंडस्ट्रीमध्ये भरपूर काम असते तर मी बिग बॉसच्या शोमध्ये कशाला आलो असतो, असे त्याने इतर सदस्यांबरोबर संवाद साधताना म्हटले होते.

हेही वाचा: “लोक मला प्लेबॉय म्हणतात, पण त्यांना…”, दोन आघाडीच्या अभिनेत्रींची फसवणूक केल्याच्या प्रतिमेवर रणबीर कपूरचे स्पष्टीकरण

दरम्यान, अभिनेत्याने बिग बॉसच्या घरात आपल्या खासगी आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत. त्याने कोंकणा सेन शर्माबरोबरच्या घटस्फोटाविषयीदेखील वक्तव्य करत ते दोघे सहपालकत्व कसे निभावतात, हे इतरांना सांगितले होते. त्याने म्हटले होते की, “मी माझ्या घरात एकटाच असतो. माझा मुलगा हारुन हा एक आठवडा माझ्याजवळ, माझ्या घरी असतो; तर एक आठवडा त्याच्या आईजवळ असतो. मुलासाठी जेवढे त्याच्या पालकांनी जवळ असणे गरजेचे असते तितके प्रयत्न आम्ही करतो. आम्ही त्याला एक घर देऊ शकत नाही, पण गोष्टी सहज सोप्या राहतील यासाठी प्रयत्न करतो. पुढे तो म्हणतो की, घटस्फोटानंतर आजही मी आणि कोंकणा एकमेकांच्या संपर्कात असतो. मला अजूनही वाटत नाही की, मी एखाद्या नवीन नात्यासाठी तयार आहे. कारण सध्या तरी मी माझ्या कामामध्ये खूश आहे.” रणवीर शौरी आणि कोंकणा यांनी सप्टेंबर २०१० मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर मार्च २०११ मध्ये त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी हारून असे ठेवले. मात्र, हे जोडपे २०१५ साली वेगळे झाले.

आता बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाची ट्रॉफी कोणता स्पर्धक आपल्या नावावर करणार हे पाहणे, महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss ott 3 contestent ranvir shorey said need of the prize money and not the winners trophy nsp
Show comments