तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सामजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ‘ताली’ वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. जिओ सिनेमावर आज ही वेब सीरिज प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री सुश्मिता सेन हिनं गौरी सावंत यांची भूमिका निभावली आहे. तर सीरिजचे दिग्दर्शन रवी जाधव आणि लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केलं आहे. दरम्यान, आपल्याच जीवनावर आधारित असलेली सीरिज पाहिल्यानंतर गौरी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा – ‘बाईपण भारी देवा’नंतर सुकन्या मोने दिसणार ‘या’ चित्रपटात; शूटिंगला सुरुवात

Ajit Pawars trusted Bhausaheb Bhoir rebelled deciding to contest Chinchwad elections independently
चिंचवड : अजित पवारांच्या पक्षातून बंडखोरी; ‘या’ नेत्याने केला अपक्ष लढण्याचा निर्धार
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Justice Gawai over Laddu case
Tirupati Laddu Row : “जेवणात लाडू नसतील अशी आशा आहे”… जेव्हा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशही हास्यविनोद करतात!
cpm polit bureau
सीताराम येचुरींच्या निधनानंतर महासचिवपदी कोणाची निवड होणार? ‘ही’ नावे आहेत चर्चेत!
‘वंचित’च्या निदर्शनांची दिशा काय?
farhan akhtar and daughters
फरहान अख्तर-अधुनाच्या घटस्फोटावर मुलींची प्रतिक्रिया काय होती? अभिनेता खुलासा करत म्हणाला, “त्यांनी भावनिक धक्का…”
Success Story ramesh babu Inspirational journey
Success Story : सलून व्यवसाय ते ४०० गाड्यांचा मालक होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; आमिर खान, अमिताभ बच्चन यांनाही दिली कार सेवा
anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

गौरी यांनी सोशल मीडियावर सुश्मिता सेनबरोबरचा फोटो शेअर करून लिहिलं आहे की, “आपलीच ‘टाळी’ जेव्हा जोरात वाजते, तेव्हा कधी कधी आपणच दचकतो, जसं आपली जीभ आपल्या दाताखाली येते तेव्हा. आज बायोपिक बघताना हेच होतं माझ्या मनात, ठिबक सिंचन डोळ्यातून चालूच होतं. तृतीयपंथीयांच्या पालकांना काय वाटत असेल….. होणारी घुसमट, त्रास याला सुश्मितानं न्याय दिला आहे… क्षितिज काय लिहिलंय रे बाबा… रवी जाधव यांनी खूप छान दिग्दर्शन केलं आहे. माझ्या संपूर्ण समाजाकडून मी तुमचे आभार मानते…सरळ सोप्या पद्धतीनं माझं आयुष्य दाखवल्याबद्दल… अफिफा नडियादवाला हिनं मला नव्यानं जगासमोर आणलं.. कार्तिक आणि अर्जुन यांचेही आभार…”

हेही वाचा – ‘लोकमान्य’ फेम अभिनेत्री आता ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेत पिंकीच्या भूमिकेत दिसणार

हेही वाचा – कधीही न पाहिलेल्या भूमिकेत झळकणार भरत जाधव; ‘हे’ नवे नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीला

गौरी सावंत यांच्या या पोस्टवर सीरिजचे दिग्दर्शक आणि लेखकानं प्रतिक्रिया दिली आहे. रवी जाधव म्हणाले की, “ज्यांच्या आयुष्यावर आपण सीरिज तयार करतो, त्यांच्याकडून कौतुक होण्यासारखा दुसरा आनंद नाही. धन्यवाद गौरी सावंत आमच्यासाठी हे सर्वात मोठं कौतुक आहे.” तर लेखक क्षितीज पटवर्धन म्हणाले की, “आमच्यासाठी सगळ्यात मोठी पावती ही आहे गौरी.”

हेही वाचा – “दीड वर्षापूर्वीच्या ‘त्या’ दिवशी…”; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाले, “काट लो जुबान…”

दरम्यान, ‘ताली’ या सीरिजमध्ये बऱ्याच मराठी कलाकारांनी काम केलं आहे. अभिनेत्री हेमांगी कवी, ऐश्वर्या नारकर, कृतिका देव, अभिनेता सुव्रत जोशी, नंदु माधव या सीरिजमध्ये पाहायला मिळत आहेत.