माणसाचं मन प्रचंड चंचल असतं. आता या ठिकाणी असेल, तर दुसऱ्याच क्षणी भलत्याच विषयाकडे गेलेलं असेल. त्याला कितीही ठिकाणावर आणायचं म्हटलं तरी ते मूळ विषयाकडे येतंच असं नाही. जगातल्या सगळ्या घटना, अनुभव आणि सुख-दु:ख यांचं मूळ असतं ते मनातच. माणसाचं जगणं हे मनाभोवतीच घुटमळत असतं. किंबहुना माणसाच्या आयुष्यात अनुभवास येणाऱ्या घटना-प्रसंग, त्यातले चढउतार, संवेदना या खरं तर बाह्य जगापेक्षा मनाच्या मंचावर घडणाऱ्याच जास्तकरून असतात. जागृतावस्थेत माणूस सतत विचार करत असतो. एकाच वेळी त्याच्या मनात स्वत:बद्दल, इतरांबद्दल, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक स्थित्यंतरांबद्दल वेगवेगळे विचार सतत येत-जात असतात. या सगळ्या विचारांचं चलनवलन त्याच्या मानसिक तसंच शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम करत असतं. त्याचे राग-लोभ, हर्ष, विषाद, उद्विग्नता, चीड, दु:ख अशा सगळ्या भावभावनांचा गुंता त्याच्या मनाला वेढून असतो. त्या-त्या भावनांनुसार त्याचं वागणं, बोलणं, कृती करणं ठरत असतं. त्या भावनांचं नियोजन तो किती व कशा प्रकारे करू शकतो यावर त्याचं व्यक्तिमत्त्व घडत वा बिघडत असतं. एकच माणूस एकाच प्रकारच्या घटनेला वेगवेगळ्या वेळी आणि संदर्भात भिन्न प्रकारे रिअॅक्ट होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ‘समजलेला’ माणूस अकस्मात आपल्याला अनोळखी वाटू शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा