सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांची मुलगी ऐश्वर्याचा ‘संघी’ शब्दावरून तिने केलेल्या विधानानंतर बचाव केला आहे. ‘संघी हा शब्द वाईट आहे असं ऐश्वर्याने कधीच म्हटलं नाही’, असं रजनीकांत म्हणाले. ‘लाल सलाम’ या चित्रपटाच्या एका कार्यक्रमात ऐश्वर्या म्हणाली होती की तिचे एक्स व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांनी दावा केला आहे की रजनीकांत हे संघी आहेत, पण जर ते संघी असते तर त्यांनी ‘लाल सलाम’ सारखा चित्रपट केला नसता.

ऐश्वर्या रजनीकांत ‘लाल सलाम’मधून दिग्दर्शिका म्हणून पुनरागमन करत आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मुलगी ऐश्वर्याने केलेल्या विधानानंतर तिचा बचाव करताना रजनीकांत म्हणाले, “माझ्या मुलीने संघी हा शब्द वाईट आहे असं कधीच म्हटलं नाही. तिने प्रश्न केला की तिचे वडील अध्यात्मिक आहेत, मग त्यांना अशा प्रकारे संघी का म्हटलं जातंय.” यासंदर्भात ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिलंय.

Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shivraj Rakshe Mother Said This Thing
Shivraj Rakshe : शिवराज राक्षेच्या आईचा सवाल, “पंचांवर कारवाई का नाही? त्यांनी माझ्या मुलाला शिवीगाळ केली आणि…”
kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
Sanjay Mone
“आमचे मोने बाबा…”, मयुरी देशमुख ज्येष्ठ अभिनेते संजय मोनेंबाबत म्हणाली, “मोठ्या लोकांचा मोठेपणा…”

“लै राग आलाय का तुला जात विचारल्याचा?” पुष्कर जोगच्या ‘त्या’ पोस्टवर किरण मानेंचे आव्हान; म्हणाले, “नेत्यांचे पाय चाटणारी जमात…”

२६ जानेवारीला चेन्नईतील एका खासगी महाविद्यालयात ‘लाल सलाम’ चित्रपटाचा ऑडिओ लाँच कार्यक्रम झाला. यावेळी ऐश्वर्या म्हणाली, “मी सहसा सोशल मीडियापासून दूर राहते, पण माझी टीम अनेकदा मला काय घडत आहे ते सांगते आणि काही पोस्ट्स दाखवत राहते. त्या पाहून मला राग यायचा. आपणही माणसं आहोत. अलीकडच्या काळात बरेच लोक माझ्या वडिलांना संघी म्हणतात. मला त्याचा अर्थ काय आहे हे माहित नव्हतं. मग मी कोणाला तरी विचारलं की संघीचा अर्थ काय आहे आणि ते म्हणाले की जे लोक एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचे समर्थन करतात त्यांना संघी म्हणतात.”

उदयपूरमध्ये शाही सोहळ्यात केलं लग्न, वर्षभरातच पतीपासून विभक्त झाली अभिनेत्री; म्हणाली, “मला किती त्रास झाला हे…”

पुढे ऐश्वर्या म्हणाली, “मी इथं स्पष्ट करू इच्छिते की माझे वडील रजनीकांत हे संघी नाहीत. ते संघी असते तर त्यांनी ‘लाल सलाम’ सारखा चित्रपट केला नसता.” मुलगी ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून रजनीकांत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

Story img Loader