सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांची मुलगी ऐश्वर्याचा ‘संघी’ शब्दावरून तिने केलेल्या विधानानंतर बचाव केला आहे. ‘संघी हा शब्द वाईट आहे असं ऐश्वर्याने कधीच म्हटलं नाही’, असं रजनीकांत म्हणाले. ‘लाल सलाम’ या चित्रपटाच्या एका कार्यक्रमात ऐश्वर्या म्हणाली होती की तिचे एक्स व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांनी दावा केला आहे की रजनीकांत हे संघी आहेत, पण जर ते संघी असते तर त्यांनी ‘लाल सलाम’ सारखा चित्रपट केला नसता.

ऐश्वर्या रजनीकांत ‘लाल सलाम’मधून दिग्दर्शिका म्हणून पुनरागमन करत आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मुलगी ऐश्वर्याने केलेल्या विधानानंतर तिचा बचाव करताना रजनीकांत म्हणाले, “माझ्या मुलीने संघी हा शब्द वाईट आहे असं कधीच म्हटलं नाही. तिने प्रश्न केला की तिचे वडील अध्यात्मिक आहेत, मग त्यांना अशा प्रकारे संघी का म्हटलं जातंय.” यासंदर्भात ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिलंय.

supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!
Owaisi sensational claim Tipu Sultan
ओवैसींचा खळबळजनक दावा “संविधानावर टिपू सुलतानचा फोटो, वल्लभभाई पटेलांची सही, भाजपाने तिरस्कार…”
aamir khan mahatma Gandhi
आमिर खान म्हणतोय, “गांधी विचारांचा माझ्यावर प्रभाव”; सेवाग्राम आश्रमाला भेट
२३ जूनला सोनाक्षी-झहीरचं लग्न नाही! शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली माहिती; म्हणाले, “मी आणि माझी पत्नी…”
Sambhaji Nagar Accident
“रील बनवताना मृत्यू नाही, माझ्या बहिणीची सुनियोजित हत्या”, बहिणीचा गंभीर दावा; म्हणाली, “३०-४० किमी लांब येऊन…”
ravindra waikar on evm hacking
“…म्हणून ४८ मतांनी माझा विजय झाला”; रवींद्र वायकरांनी सांगितलं मतांचं गणित; ईव्हीएम हॅक करण्याच्या आरोपावर म्हणाले…
Parth Pawar, Rohit Pawar, Ajit Pawar,
पक्षात नाराज असल्याच्या चर्चांवर रोहित पवारांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “माझ्या स्वभावानुसार…”
Kamran Akmal controversial remark
‘१२ बजे के बाद सिख’; थट्टेचा विषय की अभिमानाची कहाणी?

“लै राग आलाय का तुला जात विचारल्याचा?” पुष्कर जोगच्या ‘त्या’ पोस्टवर किरण मानेंचे आव्हान; म्हणाले, “नेत्यांचे पाय चाटणारी जमात…”

२६ जानेवारीला चेन्नईतील एका खासगी महाविद्यालयात ‘लाल सलाम’ चित्रपटाचा ऑडिओ लाँच कार्यक्रम झाला. यावेळी ऐश्वर्या म्हणाली, “मी सहसा सोशल मीडियापासून दूर राहते, पण माझी टीम अनेकदा मला काय घडत आहे ते सांगते आणि काही पोस्ट्स दाखवत राहते. त्या पाहून मला राग यायचा. आपणही माणसं आहोत. अलीकडच्या काळात बरेच लोक माझ्या वडिलांना संघी म्हणतात. मला त्याचा अर्थ काय आहे हे माहित नव्हतं. मग मी कोणाला तरी विचारलं की संघीचा अर्थ काय आहे आणि ते म्हणाले की जे लोक एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचे समर्थन करतात त्यांना संघी म्हणतात.”

उदयपूरमध्ये शाही सोहळ्यात केलं लग्न, वर्षभरातच पतीपासून विभक्त झाली अभिनेत्री; म्हणाली, “मला किती त्रास झाला हे…”

पुढे ऐश्वर्या म्हणाली, “मी इथं स्पष्ट करू इच्छिते की माझे वडील रजनीकांत हे संघी नाहीत. ते संघी असते तर त्यांनी ‘लाल सलाम’ सारखा चित्रपट केला नसता.” मुलगी ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून रजनीकांत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.