‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून देशभरात गदारोळ सुरू झाला आहे. काहींनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे तर काहींनी या चित्रपटाचं समर्थन केलं आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट केरळ राज्याविरोधातील प्रोपगंडा असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातील दावा सिद्ध करणाऱ्याला एक कोटी रुपयांचं बक्षिस देऊ असा दावा केरळातील एका मुस्लीम संघटनेनं केला आहे.

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून देशभरात वाद सुरू असताना अभिनेते योगेश सोमण यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा संबंध रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’मधील एका श्लोकाशी जोडला आहे. रामदास स्वामी यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाची कथा शेकडो वर्षांपूर्वी एका ओळीत लिहून ठेवली आहे, असंच मी म्हणेन, असं योगेश सोमण म्हणाले. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत याबाबत खुलासा केला आहे.

article about veteran film critic and author aruna vasudev
व्यक्तिवेध : अरुणा वासुदेव
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Film critic Aruna Vasudev passed away
चित्रपट समीक्षक अरुणा वासुदेव यांचे निधन
Rajinikanth, Rajinikanth will star in coolie movie, Nagarjuna Akkineni, nagarjuna, Sathyaraj, Shruti Haasan, Coolie movie,
सुपरस्टार रजनीकांत, नागार्जुन अन् ‘बाहुबली’ फेम सत्यराज; ‘या’ चित्रपटात दाक्षिणात्य दिग्गजांची मांदियाळी, पोस्टर प्रदर्शित
actress kangana ranaut praises indira gandhi during promotion of upcoming hindi film emergency
इंदिरा गांधींच्या आयुष्यातून खूप काही शिकण्यासारखं! अभिनेत्री दिग्दर्शक कंगना राणावतचे मत
marathi movie raghuveer review by loksatta reshma raikwar
प्रेरक चरित्रपट
Composer Avadhoot Gupte visit to Malgaon High School
चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार अवधूत गुप्ते यांची आजोळच्या मळगाव हायस्कूलला भेट
Aishwarya Rai Salman Khan in josh
सलमान खान ‘या’ चित्रपटात ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका साकारणार होता, पण…; अभिनेत्रीनेच सांगितलेला किस्सा

संबंधित व्हिडीओत योगेश सोमण म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी ‘द केरळ स्टोरी’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर इंटरनेट आणि इतर माध्यमातून या चित्रपटावरून गदारोळ झाला. काहीजणांनी या चित्रपटाचं गांभीर्य लोकांना सांगितलं. तर काहीजणांनी चित्रपटाची सत्य आणि असत्यता याबाबत आपले विचार मांडले. पण अचानक माझ्या हाती रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’ मधील चार ओळी लागल्या आहेत. मी तर म्हणतो, ‘द केरळ स्टोरी’ची ‘वन लाइन’ कथा शेकडो वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवली आहे.”

हेही वाचा- “‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या निर्मात्याला फासावर लटकवलं पाहिजे”, जितेंद्र आव्हाड यांचं विधान; म्हणाले, “अधिकृत आकडा…”

किती गुजरीणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या ।
किती शांबूखी जहाजी फाकविल्या ।
किती एक देशांतरी त्या विकिल्या ।
किती सुंदरा हाल होवोनि मेल्या।।

योगेश सोमण नेमकं काय म्हणाले? पाहा VIDEO

रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’मधील श्लोकाच्या या चार ओळी ‘द केरळ स्टोरी’ची संपूर्ण कथा सांगतात. यातील ‘शांबूखी’ शब्दाचा अर्थ सांगताना सोमण म्हणाले, ‘शांबूखी’ हा शब्द’शहामुखी’ या शब्दाचा अपभ्रंश आहे, ‘किती शांबूखी जहाजी फाकविल्या’ म्हणजे ‘किती शहामुखी जहाजा पाठवल्या’. रामदास स्वामींनी चार ओळीतून संपूर्ण ‘द केरळ स्टोरी’ची कथा शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवली आहे, असंही ते यावेळी म्हणाले.