रवींद्र पाथरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऐंशीच्या दशकात मनमोहन देसाईंसारखे बिनडोक करमणूकपट काढणारे बरेच निर्माते बॉलीवूडमध्ये होते. प्रेक्षकांनाही या सिनेमांची सवय होती. अर्थात आजही अशा बिनडोकपटांची चलती कमी झालेली नाहीए. मात्र आता नवनव्या तंत्रज्ञानामुळे आणि काहीएक नवे प्रयोग करू पाहणाऱ्या संवेदनशील तरुण सिनेमावाल्यांमुळे बॉलीवूडी सिनेमामध्येही आशय, विषयांचं नावीन्य अधूनमधून बघायला मिळतं, हेही खरंय. बाकी अक्षयकुमार, सलमान खान वगैरेंचे सिनेमे ८० च्या दशकातली ती मेंदूविहीन सिनेमांची परंपरा अजूनही टिकवून आहेत. असो. हे स्मरायचं कारण.. रत्नाकर मतकरी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘काळी राणी’ हे नाटक! ते ऐंशीच्या दशकातल्या बॉलिवूडवर आधारित आहे. त्याकाळीही हिंदी चित्रपटसृष्टीत येणाऱ्या कलावंतांना- त्यातही स्त्री-कलावंतांना शोषणाला बळी पडावं लागत होतं. सिनेमात झळकण्यासाठी ‘काय वाट्टेल ते’ करण्यास तेव्हाही महत्त्वाकांक्षी तरुणी राजी असत. त्यातून एखाद्या समूहदृश्यातलंदेखील किरकोळ काम मिळालं तरी चालेल, पण मोठय़ा पडद्यावर चमकायचंच अशी आकांक्षा बाळगणाऱ्या तरुणींचा ओघ देशभरातून मुंबईत येत असे. त्यातल्या किती जणी प्रत्यक्षात सिनेमांतून चमकत आणि किती शोषणाच्या दलदलीत फसून गतप्राण होत याचा हिशेब ना कधी बॉलिवूडने ठेवला, ना ते कधी सिनेमा इंडस्ट्री म्हणवणाऱ्यांनी मान्य केलं. आजही हे दुष्टचक्र सुरूच आहे. उलट, आता अगणित मनोरंजन वाहिन्यांच्या गर्दीने त्यात भीषण भरच पडलेली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Review of drama kaali rani written by ratnakar matkari and directed by vijay kenkare zws
First published on: 15-01-2023 at 05:20 IST