एखाद्याच्या गंभीर आजारावरील सिनेमा, नाटक किंवा एखादी लेखनकृती हास्यस्फोटक, आनंददायी असू शकते? अर्थातच.. नाही. यावर कुणी वादाकरता ‘आनंद’ सिनेमाकडे खचितच निर्देश करील. त्यात राजेश खन्ना कसा हसत हसत आपल्या दुर्धर आजाराला सामोरा गेला, वगैरे म्हणेल. ते खरंही असलं, तरी त्या सिनेमात वेदनेची एक किनार सतत पाश्र्वभूमीला होतीच. हसतखेळत आयुष्य जगण्याचा केलेला तो दिखावा आहे, हे काही केल्या विसरता येत नव्हतं. आपल्या वेदना इतरांना जाणवू नयेत याकरता घेतलेला मुखवटा! असाध्य आजाराला काही माणसं मोठय़ा धैर्यानं सामोरी जात असली आणि तशाही स्थितीत आयुष्य रसरसून जगत असली, कर्तृत्वाची नवी क्षितीजं काबीज करीत असली, तरी त्यांना आतून पक्की जाणीव असते, की हे सारं लवकरच संपणार आहे. आपण काही दिवसांचेच सोबती आहोत. त्यांनी प्रकटरीत्या दर्शवलं नाही तरी मृत्यूची जाणीव त्यांना सतत सोबतीला असतेच. फक्त ते ती व्यक्त करीत नाहीत, एवढंच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा