ऐश्वर्या राय बच्चन आपल्या संसारामध्ये चांगलीच रमली आहे. पण काही वर्षांपूर्वी सलमान खानशी तिचं असलेलं नातं आजही अनेकांच्या लक्षात आहे. सलमान तर ऐश्वर्याच्या प्रेमामध्ये आकंठ बुडाला होता. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढली. ऐश्वर्या-सलमान यांना बऱ्याचदा एकत्रही पाहिलं गेलं. यांच्या अफेअरची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. पण सलमानने केलेल्या एका कृत्याची बरीच चर्चा रंगली होती.

आणखी वाचा – Video : मराठमोळ्या व्यक्तीच्या घरी जावून करिश्मा-करीनाने झुणका भाकरीवर मारला ताव, व्हिडीओ व्हायरल

pune bibwewadi fire news
Pune Crime News : बिबवेवाडीत गुंडावर गोळीबार करणारे अटकेत, सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
premachi Goshta serial trp dropped after tejashri Pradhan exit
तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला बसला मोठा फटका, काय घडलं? जाणून घ्या…
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”
tharla tar mag wedding sequence who will arjun marry sayali or priya
‘ठरलं तर मग’ मालिकेत लगीनघाई! सायली अन् प्रिया दोघींच्या हातावर सजणार मेहंदी…; अर्जुनचं लग्न कोणाशी होणार?
Junaid Khan sat outside at Ira Khan wedding
बहिणीच्या लग्नात कुटुंबाने दिली नाही कोणतीच जबाबदारी, बाहेर बसला होता जुनैद खान, कारण…
Sanjay Nirupam on Saif Ali Khan
Sanjay Nirupam: अडीच इंचाचा चाकू घुसल्यावरही सैफ अली खान पाच दिवसात फिट कसा? संजय निरुपम यांचा सवाल

सलमानच्या वागणूकीमुळे ऐश्वर्या आणि त्याचं नातं बिनसलं असं बोललं जातं. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमानने एकदा सगळ्याच मर्यादा पार केल्या. एका रात्री दारूच्या नशेमध्ये तो ऐश्वर्याच्या घराबाहेर पोहोचला. जेव्हा मध्यरात्री सलमान तिच्या घरी गेला तेव्हा त्याने घराचं दार जोर जोरात ठोठावलं. पण यादरम्यान ऐश्वर्याने त्याला कोणतंच उत्तर दिलं नाही आणि घराचं दारही उघडलं नाही.

सलमानने यावेळी रागामध्ये ऐश्वर्याच्या घराबाहेर बराच गोंधळ घातला होता. जवळपास २ ते ३ तास दारूच्या नशेमध्येच तो तिच्या घराबाहेर उभा राहिला. तेव्हा ऐश्वर्याच्या शेजारच्या मंडळींनी हे सारं चित्र आणि सलमानची अवस्था पाहिली. या घटनेनंतर ऐश्वर्या-सलमानचं नातं अधिक चर्चेत आलं.

आणखी वाचा – लग्नानंतरही सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर सनी देओलचं सुरु होतं अफेअर, पत्नीला सत्य समजलं अन्…

सलमानच्या याच वागणूकीमुळे दोघांच्या नात्यामध्ये अधिक दुरावा निर्माण होत गेला. काही दिवसांमध्येच ऐश्वर्या-सलमानच्या नात्याचा दी एण्ड झाला. या दोघांच्या ब्रेकअपमागे सलमान जबाबदार असल्याचंही त्यावेळी बोललं गेलं. आता दोघंही आपापल्या आयुष्यामध्ये सुखी आहेत. पण आजही ऐश्वर्या-सलमान एकमेकांच्या समोर आले तरी बोलणं टाळतात.

Story img Loader