भारतीय चित्रपटांचे चाहते आज संपूर्ण जगभरात देशभरात पसरले आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप यांप्रमाणेच जपान, चीन यांसारख्या देशातही भारतीय चित्रपट आवडीने पाहिले जातात. एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ या चित्रपटाने भारतीयांना वेड लावलेच पण त्यानंतर या चित्रपटाने परदेशी प्रेक्षकांनाही भुरळ घातली आहे. मध्यंतरी या चित्रपटाच्या ऑस्करवारीवरुन बरंच वादंग झालं होतं पण आता ‘आरआरआर’ला ऑस्कर इतक्याच एका प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

एसएस राजामौली, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी नुकतीच चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त जपानवारी केली. या दोन्ही स्टार्सचे जपानमध्ये जंगी स्वागत करण्यात आले होते. यावेळचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गेल्या शुक्रवारी जपानच्या चित्रपटगृहात ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.‘आरआरआर’ हा जपानमध्ये पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. याबरोबरच या चित्रपटाला २५ ऑक्टोबर रोजी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ‘सॅटर्न पुरस्कार’ही घोषित केला आहे.

Aditya Sarpotdar
मराठी चित्रपटांनी कमाईचे आकडे दाखवणे किती गरजेचे? ‘मुंज्या’चा मराठमोळा दिग्दर्शक म्हणाला, “वाईट सिनेमांचे…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
star pravah parivaar puraskar ceremony 2025
तारीख ठरली! ‘स्टार प्रवाह’ने केली पुरस्कार सोहळ्याची घोषणा, यंदा कोणती मालिका मारणार बाजी? नेटकरी म्हणाले…
anuja short film ott release
Oscars 2025 मध्ये नामांकन अन् प्रियांका चोप्राने निर्मिती केलेली ‘ही’ शॉर्टफिल्म येणार ओटीटीवर, कधी व कुठे पाहाल? जाणून घ्या…
3g a killer connection kissing scenes
तब्बल ३० किसिंग सीन, बोल्ड दृश्यांचा भडीमार असलेला फ्लॉप बॉलीवूड चित्रपट, कमावलेले फक्त…
shahid kapoor career struggle
वडील होते प्रसिद्ध कलाकार तरीही या अभिनेत्याला राहावे लागले होते भाड्याच्या घरात, २५० ऑडिशन दिल्यावर मिळाला पहिला सिनेमा
pune balgandharva rang mandir
पुणे : नाट्यगृहांत चित्रपट संकल्पनेला प्रेक्षकांचे बळ
Ahilyanagar Mahakarandak
Ahilyanagar Mahakarandak : अहिल्यानगर महाकरंडक स्पर्धेत ‘सखा’ एकांकिकेने मिळवला प्रथम पुरस्काराचा मान, अनिल आव्हाड सर्वोत्कृष्ट अभिनेता

आणखी वाचा : ‘वास्तव’च्या सेटवर संजय नार्वेकर यांना पायऱ्यांवर बसलेलं पाहून संजय दत्त म्हणाला…

५० वर्षंपूर्तीच्या निमित्ताने या पुरस्कार सोहळ्यात वेगवेगळ्या चित्रपटांचा समावेश करण्यात आला होता. ‘एफिल’, ‘राइडर्स ऑफ जस्टिस’, ‘साइलेंट नाइट’यासारख्या चित्रपटांना मागे टाकत ‘आरआरआर’ने यात बाजी मारली आहे. सॅटर्न पुरस्कार हे ‘एकेडमी ऑफ साइंस फिक्शन, फैंटेसी,हॉरर फिल्म्स’ कडून प्रदान करण्यात येतात. यामध्ये केवळ चित्रपटच नव्हे तर वेगवेगळ्या वेबसीरिजचासुद्धा समावेश होतो.

याविषयी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर राजामौली यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, “आमच्यासाठी ही खूप आनंदाची बाब आहे. यासाठी मी माझ्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात या चित्रपटाला लोक पसंत करत आहेत.” या चित्रपटाने हिंदीत तब्बल २७४ कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहेत तर जगभरात या चित्रपटाने ११०० कोटींचा आकडा पार केला आहे.

Story img Loader