अभिनेता सैफ अली खानची ‘तांडव’ ही सीरिज प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सीरिजवर हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी या सीरिजवर आणि निर्मात्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर या सीरिजला ट्रोल केलं जात असून कलाविश्वातूनदेखील काही अंशी या सीरिजला विरोध केला जात आहे. यामध्येच आता अभिनेता मुकेश खन्ना यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुकेश खन्ना यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी सरकारला जाब विचारत या सीरिजचा निषेध केला आहे. “गेल्या बऱ्याच काळापासून सातत्याने आपल्या काही गोष्टींना लक्ष्य केलं जात आहे. आता तांडव आला आहे. मी सुरुवातीपासून एकच ओरडून ओरडून विचारतोय की सरकारला जाग का येत नाही, सेन्सॉर बोर्ड का जागं होत नाही. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय याप्रकरणी का निर्णय घेत नाही त्यामुळे यापुढे कोणीही असा प्रयत्न करणार नाही. पुन्हा असा चित्रपट किंवा वेब सीरिज कोणी तयार करु शकणार नाही. हिंदू धर्माची चेष्टा सुरु आहे. त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न सुरु आहे”, असं मुकेश खन्ना म्हणाले.

loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Gods Guns and Missionaries The Making of Modern Hindu Identity Hindu
‘हिंदू कोण’ याचा शोध
maha Kumbh Mela and flow of techniques in Hindu religion culture society structure
‘कुंभमेळा’ आणि हिंदू धर्म-संस्कृती-समाज रचना यांतील तंत्र प्रवाह!
Lakshman Shastri Joshi Manusmriti Dahan and Tarkatirtha
तर्कतीर्थ विचार: मनुस्मृती दहन व तर्कतीर्थ
Dr Mohan Bhagwat statement on religion
Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, धर्म म्हणजे….”
Loksatta natyarang Ramayana drama Urmilyan Indian culture
नाट्यरंग: ऊर्मिलायन;दृक् श्राव्यकाव्याची नजरबंदी
Indian state Rahul Gandhi
राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममध्ये एफआयआर, राजकीय स्टंट असल्याची काँग्रेसची टीका


पुढे ते म्हणतात, “मला खरंतर असं म्हणायचं नाहीये, पण बहुतेक वेळा अशा कंटेटमध्ये मुस्लिम अभिनेता किंवा मुस्लिम दिग्दर्शकच असतात. हे जाणूनबुजून किंवा मुद्दाम केलं जातंय असं माझं म्हणणं नाही. पण, मग आता हे सगळं सिद्ध करण्याची वेळ आली आहे. आता हिंदू शांत बसणार नाहीत. यावर सेन्सॉर लावलाच पाहिजे.”

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तांडव सीरिजवरुन मोठा वादंग निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी या सीरिजविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Story img Loader