सध्या मराठी मालिकाविश्वात जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही नवी मालिका भेटीस येत आहे. अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता अक्षर कोठारी यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका २० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या दुसऱ्याबाजूला ‘आई कुठे काय करते’ किंवा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ यापैकी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण यावर आता ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी यांनी भाष्य केलं आहे.

हेही वाचा – “…आणि तो अद्भुत प्रवास संपला” शंकर महाराजांची भूमिका साकारलेल्या संग्राम समेळची भावुक पोस्ट, म्हणाला…

‘हे’ दोन बॉलीवूड सुपरस्टार आहेत डेटिंग अ‍ॅपवर, उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, एक लोकप्रिय अभिनेत्रीसह आहे नात्यात
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
Navri Mile Hitlerla Fame Bhumija Patil Won Home Minister Paithani
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीला मिळाली सव्वा लाखाची पैठणी, अनुभव सांगत म्हणाली, “आदेश भाऊजींच्या…”
kareena kappor saif ali khan omkara
स्वतःचा अभिनय दाखवायला करीना कपूरने ठेवलेला चित्रपटाचा खास शो, पण घडलं उलट; किस्सा सांगत म्हणाली…
Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”
sharmila shinde slams ganesh pandals for bad behaviour
“ज्या मंडळांमध्ये योग्य वागणूक देत नाहीत तिथे…”, मराठी अभिनेत्रीची सूचक पोस्ट; म्हणाली, “माणुसकीचा कोटा…”
Dia Mirza
“स्वत:चे चित्रपट पाहताना लाज…”, अभिनेत्री दिया मिर्झाचे वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “स्त्रियांकडे बुद्धिमत्ता…”

‘लोकसत्ता ९९९’ या कार्यक्रमात अभिनेते मिलिंद गवळी आणि अभिनेत्री रुपाली भोसले हे दोघं सहभागी झाले होते. यावेळी मिलिंद गवळी यांनी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका बंद होणार की नाही? याविषयी स्पष्टच सांगितलं. ते म्हणाले, “‘आई कुठे काय करते’ ही मालिका संपणार नाही. मी जर प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं तर तुम्ही मला काढून टाकणार का?, नाही. आता जे सुरू झालंय ते कधीना कधी तरी संपणारच आहे. जन्माला आलोय तर मृत्यू हा अटळच आहे. त्याचप्रमाणे मालिकांचं असतं. अजून ‘आई कुठे काय करते’ मालिकेची गोष्ट पूर्ण झाली नाहीये. त्यामुळे जोपर्यंत गोष्ट पूर्ण होत नाही, तोपर्यंत ती मालिका बंद होत नाही. शिवाय लोकं बंद करू देणार नाहीत.”

हेही वाचा – “भक्तांचा अपमान…”, ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिका अचानक बंद; प्रेक्षकांनी केला संताप व्यक्त, म्हणाले….

पुढे मिलिंद गवळी म्हणाले की, “आज टीआरपीमध्ये आमची मालिका ४.७ ते ६.० आहे. याचाच अर्थ टेलिव्हिजन पाहणारी अर्धी लोक ‘आई कुठे काय करते’ ही मालिका पाहतात. त्यामुळे बघणाऱ्या मालिकांना बंद करत नाहीत. गोष्ट अजून सांगायची आहे. खरंतर आता संजना आणि अनिरुद्धचं नातं सुरू झालंय.”

हेही वाचा – अभिनेत्री जुई गडकरीला चिडवतात ‘गाववाली’? का ते जाणून घ्या..

मिलिंद गवळींच्या या वक्तव्यानंतर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. पण सध्या ९.३० या वेळेत सुरू असलेली मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही बंद होणार? की नव्या वेळेत भेटीस येणार? किंवा दुसरी कुठली ‘स्टार प्रवाह’वरील मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार? या सर्व प्रश्नांची उत्तर येत्या काळातच स्पष्ट होतील.