Abhijeet Kelkar : मुंबईत प्रवास करणं सगळ्यात जास्त सोयीस्कर मानलं जातं. रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्सी… एकंदर काय तर मुंबईकरांची गाडी चोवीस तास धावत असते. मात्र, गेल्या दिवसांपासून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोडींचा सामना करावा लागत आहे. याचा फटका केवळ सर्वसामान्य नागरिकांना नव्हे तर आता सेलिब्रिटींना देखील बसत आहे. याआधी ठाण्यात होणाऱ्या ट्राफिक संदर्भात ऐश्वर्या नारकर, अपूर्वा नेमळेकर या कलाकारांनी पोस्ट शेअर करत यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. आज आणखी एका मराठी अभिनेत्याने या वाहतूक कोंडी संदर्भात संतप्त पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

घोडबंदर मार्गावरून प्रवास करणाऱ्या अभिजीत केळकरने ( Abhijeet Kelkar ) संतापजनक पोस्ट शेअर करत गेल्या दीड तासांपासून एकाच ठिकाणी वाहतूक कोंडीत अडकल्याचं सांगितलं आहे. मालिकेच्या शूटिंगसाठी आता अभिनेत्याला रोज या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. दोन दिवसांआधीच अभिजीतने हा वाहतूक कोंडीचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता. आता पुन्हा एकदा असाच एकदा अनुभव आल्याने अभिजीतने संतापजनक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे.

हेही वाचा : अखेर ७ वर्षांनी वाद मिटला! जखमी गोविंदाची भाचा कृष्णा अभिषेकने घेतली भेट; म्हणाला, “मामींना भेटण्याची भीती…”

u

u

अभिजीत केळकर काय म्हणाला?

“आज शूटिंगचा साडेआठचा कॉलटाइम होता साडेसात वाजता घरून गुगल मॅप बघून निघालेला मी गेल्या दीड तासांपासून घोडबंदर रोडवरच्या घाटाच्या ही बराच आधी असलेल्या शेल पेट्रोल पंपच्या इकडे बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. ट्राफिक कधी सुटणार शूटिंगला आपण कधी पोहोचू शकणार हे माहीत नाही. या केऑटिक सिच्युएशन मध्ये घाणेरड्या रस्त्यांमुळे आणि बेशिस्त ट्रक ड्रायव्हर्समुळे, एखादा ट्रक किंवा ट्रॉलर उलटून त्याच्या खाली माझा मृत्यू झालाच आणि माझ्या पश्चात त्या स्पॉटला चुकून माकून माझं नाव द्यायचा विचार झालाच तर माझा उल्लेख, “अभिनेता” अभिजीत केळकर असा न करता “चांद्र मोहीम वीर” अभिजीत केळकर असा करावा ही विनंती…”

अभिजीत केळकरची पोस्ट ( Abhijeet Kelkar )

हेही वाचा : हृतिक रोशनच्या पहिल्याच चित्रपटाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये का झाली होती? ‘हे’ आहे कारण…

y

u

दरम्यान, अभिजीतच्या ( Abhijeet Kelkar ) पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील सहमती दर्शवत कमेंटमध्येही संतापजनक भावना व्यक्त केल्या आहेत. “मुंबईत सगळीकडे अशीच परिस्थिती आहे”, “खरंच खूप खराब रस्ते आहेत”, “अभिजीत अरे काळजी घे…असलं काही बोलू नकोस”, “अजून २ वर्षे तरी या घोडबंदर मार्गाने प्रवास करू नये” अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी देखील घोडबंदर मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर आपली मतं मांडली आहेत.