Bigg Boss Marathi 5 व्या पर्वाला सुरू होताच घरात दोन गट पडले होते. टीम ए आणि टीम बी, असे हे दोन गट होते. या दोन्ही गटांमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वादविवाद, भांडणे होत असल्याचे दिसत होते.

टीम एमध्ये निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, घनश्याम हे सदस्य होते. काही काळानंतर या टीममध्ये फूट पडलेली दिसली. हा ग्रुप हळूहळू नाहीसा झाला. तर, टीम बीमध्ये धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, आर्या आणि इतर सदस्य होते. आता बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा उपविजेता ठरलेल्या अभिजीत सावंतने घरात वेगळा ग्रुप तयार झाला असता, असे एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

काय म्हणाला अभिजीत सावंत?

बिग बॉस मराठी ५ नंतर अभिजीत सावंतने ‘अल्ट्रा मराठी बझ’ला मुलाखत दिली. यावेळी त्याला विचारण्यात आले की, शेवटच्या दोन आठवड्यांत तू गेम बदललास. सुरुवातीपासूनच तुझी निक्कीबरोबर मैत्री होती. पण, अरबाज बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्यानंतर तुमची मैत्री जास्त दिसली. हा गेमचा प्लॅन होता की ही मैत्रीच होती? याबाबत बोलताना अभिजीतने म्हटले, “माझा गेमचा प्लॅन असा कधी नव्हताच. मी तिच्याबरोबर कधीच गेमबद्दल बोललो नाही. जर बिग बॉसचे हे पर्व अजून लांबले असते, तर निक्की, जान्हवी व मी असा वेगळा ग्रुप बनवला असता किंवा तो ए ग्रुप तयार झाला असता; पण ती संधी आम्हाला मिळाली नाही. आता मी सांगू शकतो की, जवळजवळ तो ग्रुप तयार झाला होता. आम्ही तिघे एकत्र आलो होतो; पण, तो गेम पुढे घेऊन जाऊ शकलो नाही.”

पुढे अभिजीतने म्हटले, “ज्या प्रकारे डीपी आणि अंकिताला माझ्या काही गोष्टी आवडत नव्हत्या. ते माझ्याबद्दल बोलत होते, त्यामुळे मी त्यांच्यापासून लांब गेलो होतो. गोष्टी हाताबाहेर चालल्या होत्या. विचार जुळत नव्हते. ज्या प्रकारे सूरजला वागवले जात होते, तेदेखील मला चुकीचे वाटत होते.”

हेही वाचा: Bigg Boss Marathi: जान्हवी किल्लेकरला जाऊबाई म्हणाली, “मी घरात येऊन तुला मारलं असतं…”

याबरोबरच मी निक्कीच्या कोणत्याही चुकीच्या गोष्टीला पाठिंबा दिला नाही. मला असं वाटायचं की, मी पाठिंबा दिला नाही पाहिजे. दोन्ही टीममधील लोक चुका करायचे, असेही अभिजीतने म्हटले आहे.

दरम्यान, अभिजीत सावंत या पर्वाचा उपविजेता ठरला आहे. आपल्या वागण्याने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. जंटलमेन असेही त्याला म्हटले गेले. आता अभिजीत सावंतची बिग बॉसनंतर पुढची वाटचाल कशी असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Abhijeet Sawant reveals that reason of differences with team b If the show had been extended I would have teamed up with Nikki and Janhavi nsp 98

Abhijeet Sawant, अभिजीत सावंत, janhavi killekar, nikki tamboli, निक्की तांबोळी, entertainment, मनोरंजन,bigg boss marathi 5, बिग बॉस मराठी ५,