अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने २३ जुलै रोजी गायक आशिष कुलकर्णीशी साखरपुडा उरकला. सध्या तिच्या साखरपुड्याची आणि लग्नाची जोरदार चर्चा आहे. स्वानंदी ही ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर आणि सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांची कन्या आहे. तिचं लग्न कधी होणार याबाबत तिचे वडील उदय टिकेकर यांनी माहिती दिली.

साखरपुडा झाला, लग्न कधी करणार? स्वानंदी टिकेकर म्हणाली, “आमच्या आयुष्यातील एका…”

kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
daughter in law Smita Deo told the reason why Seema Dev quit acting
…म्हणून सीमा देव यांनी अभिनय करणं सोडलं होतं, सूनबाई स्मिता देव यांनी सांगितलं कारण
Prajkata Mali
“अत्यंत स्वाभिमानी…”, प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’विषयी खुलासा; म्हणाली, “पुण्यात आल्यावर शास्त्रीबुवांचा परीसस्पर्श…”
govinda david dhawan not doing film reason
…म्हणून सुपरहिट सिनेमे देणाऱ्या गोविंदा आणि डेव्हिड धवनने एकत्र काम करणं केलं बंद, सुनीता आहुजांनी सांगितलं कारण, म्हणाल्या…
actress suruchi adarkar express her feeling about her husbond piyush ranade on occasion of ganesh festival
लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सावानिमित्ताने अभिनेत्री सुरुची अडारकरने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, “बाप्पा, तुझ्या येण्याने… “
actress spruha joshi made modak on the occasion of ganesh festival video viral on social media
गणेशोत्सावाच्या निमित्ताने अभिनेत्री स्पृहा जोशीने बनवले उकडीचे मोदक, तिच्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत म्हणाले…
Mammootty breaks silence
Mammootty : “चित्रपट म्हणजे समाजाचं प्रतिबिंब, त्यात..” ; हेमा समितीच्या अहवालावर अभिनेते मामुट्टींनी सोडलं मौन

स्वानंदी व आशिषचा साखरपुडा झाल्यानंतर त्यांचं लग्न कधी होणार, याची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. स्वानंदीने अजुन त्याबाबत सांगितलेलं नाही, लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं ती म्हणाली होती. मात्र तिच्या वडिलांनी लग्न कधी व कुठे होणार याबाबत सांगितलं आहे. उदय टीकेकर म्हणाले, “स्वानंदी व आशिष यांचं लग्न डिसेंबरमध्ये होईल. त्यांचं लग्न पुण्यातच होईल. आम्हीही पुण्याचेच आहोत आणि आशिषचं कुटुंबही पुण्याचं आहे. मी कामानिमित्त मुंबईत असतो. लग्नाचं ठिकाण पुणे असेल पण लोकेशन खूप सुंदर असेल.”

“असे शब्द जे तू वडिलांना सांगू शकत नाही”, चाहत्याने रवींद्र महाजनींबद्दल विचारलेल्या प्रश्नावर गश्मीर म्हणाला, “मी माझ्या…”

मुलीच्या लग्नाबद्दल त्यांच्या भावना उदय टिकेकर यांनी सांगितल्या. “मुलगी लग्न करून जाईल त्यामुळे भावुक होणार नाही. कारण आम्ही तिघेही आतापर्यंत एकमेकांपासून कामानिमित्त दूर जायचो. मी भावुक होतोय कारण ती खूप चांगल्या लोकांमध्ये जाणार आहे. मुलगा खूप चांगला आहे. बाप्पाची कृपा आहे की तिला चांगलं कुटुंब आणि चांगला मुलगा मिळाला आहे, त्यांनाही चांगली मुलगी मिळाली आहे. या गोष्टीमुळे मी खूप भावुक होत आहे,” असं उदय टिकेकर म्हणाले.

स्वानंदी ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेसाठी विशेष ओळखली जाते. ‘अस्सं माहेर नको गं बाई’, “अगं अगं सुनबाई…” या मालिकेत स्वानंदीने मुख्य भूमिका केल्या होत्या. तर आशिष ‘इंडियन आयडॉल’मध्ये दिसला होता.