एव्हरग्रीन कपल म्हणून ओळखले जाणारे अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांची जोडी नेहमी चर्चेत असते. अभिनयाबरोबर ही जोडी सोशल मीडियावरील पोस्टमुळेही सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. ते अनेकदा त्यांच्या पोस्टमधून एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करत असतात. आता ऐश्वर्या नारकर यांनी अविनाश नारकर यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहीत त्यांच्यातलं नातं उलगडलं आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्या दोघांचं एक रील शेअर केलं. या रीलमध्ये टे दोघं “वी आर बेस्ट फ्रेण्ड्स” असं म्हणताना दिसत आहेत. ही रील शेअर करत ऐश्वर्या नारकर यांनी अविनाश नारकर यांच्यासाठी एक खास कॅप्शन लिहिली.

dr tara bhawalkar honored with loksatta durga lifetime achievement award
माणसातील जनावर अजूनही जिवंत आहे; डॉ. तारा भवाळकर यांची स्पष्टोक्ती ;‘ लोकसत्ता दुर्गां’चा गौरव सोहळा
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
Mahesh Landge, Wagheshwar Maharaj temple,
‘भोसरी माझी आई, तर चऱ्होली मावशी’; महेश लांडगे यांनी दोन माजी महापौरांसह ठोकला शड्डू
Notice to Karnataka Health Minister in case of derogatory remarks about Swatantra Veer Savarkar Pune news
स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांना नोटीस; सात्यकी सावरकर यांच्याकडून माफी मागण्याची मागणी
sanjay raut
“वंदे मातरमला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार केलं,आता हिंदुत्त्वाचा गब्बर…”; इद्रीस नायकवाडींच्या शपथविधीवरून संजय राऊतांचं टीकास्र!
aditya thackeray devendra fadnavis
“…तर इगो कुणाचा दुखावतोय, हे कळेल”; देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपाला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर!
ajit pawar nitin gadkari ladki bahin yojana statement
“…तर आम्ही लाडकी बहीण योजना सुरुच केली नसती”; नितीन गडकरींच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया
ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”

आणखी वाचा : “मी पहिल्यांदा शॉर्ट्स घातली आणि…” ऐश्वर्या नारकर यांनी रंगलेल्या चर्चंबाबत केलं भाष्य

हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं, “आता २५ हून अधिक वर्षं झाली…त्याने नेहमीच मला पाठिंबा दिला. ज्या गोष्टी मी करू शकेन की नाही असं मला वाटत असताना त्याने मला त्या करायला प्रोत्साहन दिलं. मला स्वतःचा शोध घ्यायला मदत केली. काही बाबतीत आमची मतं वेगळी असली तरीही आम्ही प्रत्येक क्षण एन्जॉय करतो. यालाच आनंदी आयुष्य म्हणतात. मला माहीत आहे की मित्र म्हणून तू नेहमी माझ्याबरोबर होतास, आहेस आणि यापुढेही असणार आहेस. न संपणारी मैत्री…”

हेही वाचा : Video: “एकाही पैशाचा मोबदला न घेता त्यांनी…”, ‘लोकमान्य’ मालिका संपताच स्पृहा जोशीने सांगितली पडद्यामागची गोष्ट

आता त्यांची ही पोस्ट त्यांच्या चाहत्यांनाखूप आवडली असून त्यांच्यात असलेल्या या बॉंडिंगचं सर्वजण सोशल मिडियावरून कौतुक करत आहेत.