कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे, कधी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तर कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेत्री रुचिरा जाधव(Ruchira Jadhav)ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री रुचिराने इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर फोटो शेअर करत ती एका दिवसात गणपतीसाठी तिच्या गावी जाऊन आल्याचं सांगितले आहे.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
titeeksha tawde visits kokan with husband siddharth bodke
Video : कोकणातलं घर, भातशेती अन्…; तितीक्षा तावडेने नवऱ्याला दाखवलं निसर्गरम्य गाव अन् माहेरचं घर; पाहा व्हिडीओ
Gautam Rode Pankhuri Awasthy break up thoughts
सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Hungama 2 actress Pranitha Subhash blessed with baby boy
बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, तीन वर्षांपूर्वी बिझनेसमनशी केलंय लग्न
Lalbaugcha raja 2024 darshan mumbai devotees get pushed shoved at lalbaugcha raja amid stampede like situation
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताय? ‘हा’ VIDEO पाहा अन् तुम्हीच सांगा चूक भाविकांची की कार्यकर्त्यांची?

“बाप्पा म्हणाला, पुढच्या वर्षी नाही, याच वर्षी ये…”

रुचिराने शेअर केलेल्या फोटोंबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले, “बाप्पा म्हणाला, पुढच्या वर्षी नाही, याच वर्षी ये. बाप्पांसाठी आणि माझ्या पप्पांसाठी,गेलेच. काय दिवस होता. सकाळी जाऊन संध्याकाळी परत मुंबईला परत आले. आपल्या कोकण रेल्वेची किमया. तसं मी चिपळूणची आहे पण सकाळची वंदे भारत चिपळूनला थांबत नाही त्यामुळे खेडला उतरले. आणि जे जे ठरवलं होतं, ते सगळं करुन आले. ते १८ तास थकवणारे होते मात्र तरीही सगळं छान झालं. माझं गाव अख्खं फिरून आले, सॉरी जगून आले. काकीच्या हातचं बेसन भाकरी खाण्यापासून ते सोमेश्वरच्या मंदिरात जाईपर्यंत. मी कोकण प्रवासासाठी जे ठरवलेलं ते जवळजवळ सगळं पूर्ण केलं. खूप वर्षांनी गणपतीला गावी गेले होते.
लहानपणी दरवर्षी जायचे. माझं खूप मोठं कुटुंब आहे. आम्ही खूप मजा करायचो.”

इन्स्टाग्राम

“माझ्या लक्षात आहे की मुंबईत माझी शाळेत १०० टक्के हजेरी असायची. फक्त गणपतीच्या सुट्टीत एक खाडा व्हायचा. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही निघत असू. नंतर शूटमुळे जाणं कमी झालं. पण मी कमीत कमी गणपतीला २-३ दिवस गावी जाऊ, असं मी ठरवलं होतं. कोव्हिडनंतर तर ब्रेक लागला. गेल्या ५-६ वर्षात गणपतीसाठी जाऊच शकले नाही. पण या वर्षी या दिवसासाठी सुट्टी घेतली. मी ठरवले होते, मला जायचे आहे. मला माझ्या बाबांच्या चेहऱ्यावरचे हसू पहायचे होते. पप्पांची नेहमी इच्छा असते, मी त्यांच्यासोबत जाऊ. आधी ते आग्रह करायचे, आता फक्त विचारतात, एक दिवसासाठी तरी जमेल का यायला? मग काय, अचानक प्लॅन बनवला आणि दोघांना सरप्राइज दिलं.” अशी पोस्ट लिहित अभिनेत्रीने एक दिवसाचा कोकण प्रवास सांगितला आहे.

हेही वाचा: “याला म्हणतात माणुसकी”, मलायका अरोराच्या वडिलांचे निधन झाल्यावर नेटकरी अरबाज खानचं करतायत कौतुक

तिच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी अप्रतिम, छान, असे म्हणत तिचे कौतुक केले आहे.

दरम्यान, रुचिराच्या कामाबद्दल बोलायचे तर तिने ‘सोबत’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तर ‘तुझ्यावाचून करमेना’ या मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केले होते. ती बिग बॉस मराठीच्या ४ व्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.