ड्रामा क्वीन राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांनी मागच्या वर्षी लग्न केलं. त्यानंतर काही महिन्यातच दोघांची भांडणं होऊ लागली. राखीने आदिल खानवर फसवणुकीचे, मारहाणीचे गंभीर आरोप केले आणि त्याच्याविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आदिल खानला अटक केली. काही महिने तुरुंगात राहिल्यानंतर आदिल खानची सुटका झाली. राखी व आदिलच्या घटस्फोटाच्याही चर्चा आहेत. अशातच आदिलला राखीला माफ करण्याबद्दल विचारण्यात आलं.

नुकतंच आदिलला खानला विचारण्यात आलं की तू राखीला माफ करशील का? त्यावर आदिलने स्पष्ट नकार दिला. ‘इन्स्टंट बॉलीवूड’शी बोलताना तो म्हणाला, “मी राखीला कधीच माफ करणार नाही. तिने माझ्याबरोबर जे केलं ते खूप अती होतं. ती जर गप्प बसली असती तर एकवेळ मी तिला माफ करण्याचा विचारही केला असता. पण अजुनही ती माझी, माझ्या कुटुंबाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहे. तिला शक्य त्या सर्व वाईट गोष्टी ती माझ्याबद्दल करण्याचा प्रयत्न करतेय. राखी माफीलायक नाही, ती खूप वाईट आहे. तिने माझं आयुष्य आणि करिअर दोन्ही बरबाद करण्याचा प्रयत्न केला. मी लोकांच्या प्रेमामुळे अजुनही जिवंत आहे, नाहीतर कधीच मेलो असतो, असं त्याने सांगितलं.

Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Who is Saif Ali Khan attacker lawyer
Saif Ali Khan Attack: “तो मी नव्हेच..”, सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा दावा; वकिलांनी काय माहिती दिली?
Attacker tells police how he stabbed Saif Ali Khan near spine
सैफ अली खानवर हल्ला कसा केला? आरोपी पोलिसांना म्हणाला, अभिनेत्याने घट्ट पकडल्यावर हालचाल न करता आल्याने…
stabbing accused friend says Never imagined he could commit such crime
“तो दयाळू…” सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीबद्दल त्याच्या मित्राची प्रतिक्रिया; म्हणाला, “इतका मोठा गुन्हा…”
Imtiaz Jaleel On Beed Guardian Minister
Imtiaz Jaleel : “अजित पवार फक्त कागदावर बीडचे पालकमंत्री असतील, अन् दुसरंच कोणी…”, इम्तियाज जलील यांचा आरोप
Anand Dave on Saif Ali khan
“तैमुर नावामुळे सैफवर हल्ला झाला असता तर आम्हाला…”, जितेंद्र आव्हाडांवर टीका करताना आनंद दवे यांचं विधान
Sandeep Kshirsagar On Walmik Karad
Sandeep Kshirsagar : “वाल्मिक कराडपर्यंत तपास आला की तपास थांबतो, कारण…”, संदीप क्षीरसागर यांचा खळबळजनक आरोप

या व्हिडीओवर राखी सावंतने कमेंट्स केल्या आहेत. “तो लोकांना स्वतःच्या फायद्यासाठी वापरतो. त्याने माझा वापर केला, आता तो शर्लिन चोप्रा व राजश्रीचा वापर करत आहे. तुम्ही या व्यक्तीबरोबर माझं नाव घेऊ नका, माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही. हा वाईट माणूस आहे, माझं नाव वापरणं बंद कर” असं राखीने कमेंटमध्ये लिहिलं.

Rakhi sawant
राखी सावंतची कमेंट

दरम्यान, राखी व आदिल दोघेही एकत्र ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. राखी व आदिल एकत्र बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करणार आहेत, असं म्हटलं जात आहे. पण राखी व आदिल दोघांनीही याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

Story img Loader