अनेक कलाकार त्यांच्या अभिनयासाठी कमी आणि कॉन्ट्रोव्हर्सीसाठी जास्त ओळखले जातात. यातलंच एक नाव म्हणजे अर्शी खान होय. अर्शी खान ‘बिग बॉस ११’ मध्ये स्पर्धक म्हणून आणि ‘बिग बॉस १४’ मध्ये चॅलेंजर म्हणून पोहोचली होती. ‘बिग बॉस’च्या घरात असताना तिने केलेली वक्तव्ये चांगलीच चर्चेत होती. त्यापैकी एक वक्तव्य तिने तिच्या आजोबांबद्दल केलं होतं.

“तुमचे अज्ञान आणि आंधळेपणा…” परदेशी माध्यमांनी दीपिका पदुकोणची ओळख चुकीची सांगितल्याने नेटकऱ्यांचा संताप

kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Zeenat Aman shares her pill swallowing horror story
“औषध घेताना गोळी घशात अडकली अन् माझा श्वास…..”; झीनत अमानने सांगितला भयावह किस्सा; तुमच्याबरोबर असे घडले, तर काय करावे?
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”
Marathi actor saurabh gokhale
“मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर, मॅनेजर…”; मराठी अभिनेता पोस्ट करत म्हणाला, “बेताल, बेलगाम…”
Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra Talk About Sidharth Shukla
“मनाने खूप मोठा माणूस…”, सिद्धार्थ शुक्लाशी तुलना करण्यावरून करणवीर मेहराचं वक्तव्य; जुनी आठवण सांगत म्हणाला, “त्याची महागडी बाईक…”

अर्शीने बिग बॉसच्या घरात असताना अनेक विधानं केली होती. त्यातली बरीच विधानं खोटी होती. अर्शीने तिचे आजोबा चरित्र्यहीन असल्याचं नॅशनल टेलिव्हिजनवर म्हटलं होतं. तिचे आजोबा मुळचे अफगाणिस्तानमधले होते. आपले आजोबा चरित्र्यहीन होते, त्यांनी१८ लग्ने केली होती आणि त्यांची १२ मुलं होती, असं अर्शी खान म्हणाली होती.

अर्शीच्या या वक्तव्यानंतर बराच गदारोळ झाला होता. तिच्या आईने ती खोटं बोलत असल्याचंही म्हटलं होतं. यानंतर अर्शी खानचे पालक संतापले होते. कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी अर्शीच्या वडिलांना मीडियासमोर यावे लागलं आणि स्पष्टीकरण द्यावं लागलं. जेव्हा आपल्या वडिलांचे निधन झाले तेव्हा अर्शी फक्त चार वर्षांची होती. आपल्यालाही स्वतःच्या वडिलांबद्दल फार कमी माहिती आहे, मग अर्शीला कशी माहिती असेल, असं अर्शीच्या वडिलांनी म्हटलं होतं.

मंडप सजला, पाहुणेही आले पण स्वरा भास्कर आणि फहाद अहमदने लग्नच केलं नाही, कारण…

अर्शीचे आजोबा अफगाणिस्तानचे नव्हते. तसेच त्यांनी १८ लग्नही केली नाहीत. अर्शीच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, त्यांच्या बाबांची फक्त दोन लग्ने झाली होती आणि इंग्रजांच्या काळात ते भोपाळ सेंट्रल जेलचे जेलर होते. आजोबांनी १८ लग्न केली या अर्शीच्या म्हणण्यावर तिची आई म्हणाली होती की, अर्शी पब्लिसिटीसाठी काहीही करु शकते. ती माध्यमांचं लक्ष स्वतःकडे वळवण्यासाठी कुटुंबाचे नावही बदनाम करु शकते. ती प्रसिद्ध होण्यासाठी कितीही खोटं बोलू शकते असे तिची आई म्हणाली होती.

Story img Loader