Bigg Boss Marathi 5वे पर्व सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. घरातील स्पर्धकांमध्ये होणारे भांडण, वाद-विवाद, बिग बॉसने दिलेले टास्क याबरोबरच भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने स्पर्धकांची घेतलेली शाळा अशा विविध कारणांमुळे हे पर्व मोठ्या चर्चेत आहे. आता बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या गोष्टींवर प्रेक्षक, कलाकारमंडळी आणि आधीच्या पर्वातील सदस्य सोशल मीडियावर आपले मत मांडताना दिसतात. आता बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातील स्पर्धक सोनाली पाटीलने एका मुलाखतीदरम्यान जान्हवी किल्लेकरबद्दल वक्तव्य केले आहे.

काय म्हणाली सोनाली पाटील?

सोनाली पाटीलने नुकतीच ‘अल्ट्रा बझ मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी तिला जान्हवी किल्लेकरच्या खेळाबद्दल विचारले असता सोनालीने म्हटले, ” जान्हवीचा गेम इतका घाणेरडा आहे. मला असं वाटलं की आमच्या सीझनमध्ये मीरा होती, तीच मला भयानक वाटायची. अशा दहा मीरा जान्हवी खाऊन आलीय. मला तिचा गेम अजिबातच आवडला नाही. एक टक्काही ती आवडली नाही. जेव्हा ती वाईट बोलते किंवा तिची जी देहबोली असते, ते जास्तीचं करायची काही गरज नाही. जिथे तू शब्दांनी शांत बसवू शकते तिथे हे करायची गरज नाही. ही मालिका सुरू आहे का? ती त्याच झोनमध्ये आहे.” असे सोनालीने म्हटले आहे.

जान्हवीला बिग बॉसने तुरुंगात राहण्याची शिक्षा दिली होती, त्या तुरुंगातून ती बाहेर आलीय. तर तिचं वागणं बदललं असेल, असे वाटते का? या प्रश्नाचे उत्तर देताना सोनालीने म्हटले, “कुठे ना कुठे तिला जाणीव झाली आहे. रितेश दादाने तिला जी शिक्षा दिलीय, त्यावरुन ती एवढीच शिकलीय की आपल्यापेक्षा मोठ्याशी कसं बोलायचं. जसं तिथे वर्षाताई आहेत, त्यांच्याशी कसं बोललं पाहिजे हे तिला कळलंय. बाकी ती काही बदलेली नाही, ती जशीच्या तशीच आहे.”

याबरोबरच, जान्हवी विरुद्ध निक्की असे समीकरण बिग बॉसच्या घरात पाहायला मिळत आहे. यावर बोलताना तिने म्हटले, “जर पहिल्या दिवसापासून निक्कीच्या विरोधात जान्हवी असती आणि बी टीम जर तिच्याबरोबर असती तर जान्हवी कमालीची चांगली दिसली असती. पण पहिल्या दिवसापासूनच जान्हवी निक्कीची सावली झाली. आता ती तिच्या विरोधात खेळत असली तरी तिचा काही वेगळा गेम नाही. तो चूकीचाच गेम आहे.”

हेही वाचा: १४ वर्षांचा संसार मोडला, १० वर्षांनी लहान व्यक्तीच्या प्रेमात आहे लोकप्रिय अभिनेत्री, पतीनेही केलंय दुसरं लग्न

दरम्यान, गेल्या आठवड्यात जान्हवीला तिच्या चूकीच्या वागण्यासाठी जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली होती. आता या आठवड्यात बिग बॉसच्या घरात काय होणार, कोणता कल्ला होणार आणि बिग बॉसमधील समीकरणे कशी बदलणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.