Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दररोज वेगवेगळे ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहेत. घरात पहिल्या दिवसापासून दोन गट पडले आहेत. पहिला गट आहे टीम ‘ए’ आणि दुसरा गट आहे टीम ‘बी’. यातील ‘ए’ ग्रुपमध्ये निक्की, अरबाज, जान्हवी आणि वैभव आहेत. तर, टीम ‘बी’मध्ये अभिजीत, आर्या, अंकिता, डीपी, पॅडी, सूरज, वर्षा हे सदस्य आहेत. दोन्ही गट घरात एकमेकांशी जोरदार भांडणं करत असतात. तर, टास्कमध्येही हे दोन्ही ग्रुप एकमेकांशी वाद घालत असल्याचं पाहायला मिळतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरात ( Bigg Boss Marathi ) या दोन्ही ग्रुपमध्ये कितीही भांडणं असली तरीही अभिजीत आणि निक्की यांची एकमेकांशी खूप चांगली मैत्री आहे. दोघेही अनेकदा एकमेकांसाठी स्टॅण्ड घेताना दिसतात. अभिजीत निक्कीला खूपदा समजावताना दिसतो. परंतु, त्यांची ही मैत्री निक्कीच्या ग्रुपला अमान्य आहे. याच कारणावरून घरात वाद सुरू आहेत.

नॉमिनेशन टास्कदरम्यान अभिजीतला वैभवला नॉमिनेट करायचं असतं. यासाठी दोन्ही ग्रुपमध्ये घन:श्याम आधी अभिजीतला नॉमिनेट करा आणि त्यानंतर अभिजीत वैभवला नॉमिनेट करणार अशी डील होती. परंतु, घन:श्यामने आधी नॉमिनेट केल्यावर अरबाज शेवटच्या राऊंडमध्ये पॅडीला नॉमिनेट करण्यासाठी उभा राहणार असतो. यावेळी निक्की, “तू शब्द दिलाय…असं करू नका” ही गोष्ट आपल्या मित्रांना सांगते. टास्क संपल्यावर आर्या, इरिना, अभिजीत, वैभव नॉमिनेट होतात. परंतु, या सगळ्याचा परिणाम वैभववर होतो.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : वैभवची ‘ती’ डील फसली! बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाले ४ सदस्य, कोण आहेत ते?

निक्कीला टास्कमध्ये अभिजीतची बाजू घेण्याची गरज नव्हती अशी ग्रुप ‘ए’मध्ये चर्चा रंगते. आता निक्कीने अभिजीतची बाजू घेतल्याने अरबाज तिच्यावर प्रचंड वैतागतो. टीम ‘ए’च्या मैत्रीत देखील हळुहळू फुट पडत असल्याचं सध्या पाहायला मिळतलंय. नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये निक्की, वर्षा व अभिजीतला नेमकं काय म्हणाली पाहूयात…

Bigg Boss Marathi : अरबाज-निक्कीमध्ये वाद

अरबाजबद्दल निक्की, वर्षा-अभिजीतला सांगते, “त्याचं म्हणणं हेच आहे की, आम्ही सगळे याच्या ( अभिजीत ) विरोधात आहोत. तर, तू याच्या विरोधात का नाही आहेस?” तर, दुसरीकडे अरबाज जान्हवी, इरिना, अंकिता एकत्र असताना त्यांना सांगतो, “तुम्ही ( निक्की-अभिजीत ) आता एकमेकांशी एवढं बोलता तर, दिवसभर बोला ना…जेव्हा अभिजीतसमोर असेल ना तेव्हा प्लीज मध्ये नको येऊ… मी आता बैल झालोय…सांड आता मी कुठेही भिडणार…”

दरम्यान, अभिजीतशी मैत्री ठेवल्यामुळे सध्या अरबाज निक्कीवर चांगलाच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. आता नव्या भागात काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

घरात ( Bigg Boss Marathi ) या दोन्ही ग्रुपमध्ये कितीही भांडणं असली तरीही अभिजीत आणि निक्की यांची एकमेकांशी खूप चांगली मैत्री आहे. दोघेही अनेकदा एकमेकांसाठी स्टॅण्ड घेताना दिसतात. अभिजीत निक्कीला खूपदा समजावताना दिसतो. परंतु, त्यांची ही मैत्री निक्कीच्या ग्रुपला अमान्य आहे. याच कारणावरून घरात वाद सुरू आहेत.

नॉमिनेशन टास्कदरम्यान अभिजीतला वैभवला नॉमिनेट करायचं असतं. यासाठी दोन्ही ग्रुपमध्ये घन:श्याम आधी अभिजीतला नॉमिनेट करा आणि त्यानंतर अभिजीत वैभवला नॉमिनेट करणार अशी डील होती. परंतु, घन:श्यामने आधी नॉमिनेट केल्यावर अरबाज शेवटच्या राऊंडमध्ये पॅडीला नॉमिनेट करण्यासाठी उभा राहणार असतो. यावेळी निक्की, “तू शब्द दिलाय…असं करू नका” ही गोष्ट आपल्या मित्रांना सांगते. टास्क संपल्यावर आर्या, इरिना, अभिजीत, वैभव नॉमिनेट होतात. परंतु, या सगळ्याचा परिणाम वैभववर होतो.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : वैभवची ‘ती’ डील फसली! बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाले ४ सदस्य, कोण आहेत ते?

निक्कीला टास्कमध्ये अभिजीतची बाजू घेण्याची गरज नव्हती अशी ग्रुप ‘ए’मध्ये चर्चा रंगते. आता निक्कीने अभिजीतची बाजू घेतल्याने अरबाज तिच्यावर प्रचंड वैतागतो. टीम ‘ए’च्या मैत्रीत देखील हळुहळू फुट पडत असल्याचं सध्या पाहायला मिळतलंय. नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये निक्की, वर्षा व अभिजीतला नेमकं काय म्हणाली पाहूयात…

Bigg Boss Marathi : अरबाज-निक्कीमध्ये वाद

अरबाजबद्दल निक्की, वर्षा-अभिजीतला सांगते, “त्याचं म्हणणं हेच आहे की, आम्ही सगळे याच्या ( अभिजीत ) विरोधात आहोत. तर, तू याच्या विरोधात का नाही आहेस?” तर, दुसरीकडे अरबाज जान्हवी, इरिना, अंकिता एकत्र असताना त्यांना सांगतो, “तुम्ही ( निक्की-अभिजीत ) आता एकमेकांशी एवढं बोलता तर, दिवसभर बोला ना…जेव्हा अभिजीतसमोर असेल ना तेव्हा प्लीज मध्ये नको येऊ… मी आता बैल झालोय…सांड आता मी कुठेही भिडणार…”

दरम्यान, अभिजीतशी मैत्री ठेवल्यामुळे सध्या अरबाज निक्कीवर चांगलाच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. आता नव्या भागात काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.