Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा खेळ सध्या खूपच रंजक वळणावर जाऊन पोहोचला आहे. पहिल्या दिवसांपासून ‘टीम ए’मध्ये असणारी मैत्री आता कायमची तुटली आहे. कॅप्टन्सी टास्कच्या पहिल्या फेरीतच जान्हवीने अरबाजला शर्यतीतून बाद करत इथून पुढे ती वैयक्तिकरित्या खेळेल असं स्पष्टपणे सर्वांना सांगितलं. टास्कमध्ये पहिल्याच फेरीत बाद केल्याने अरबाज-जान्हवीमध्ये वाद देखील झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॅप्टनपदासाठी उमेदवार म्हणून अरबाज, सूरज, वर्षा, वैभव आणि धनंजय असे पाच सदस्य दावेदार होते. यापैकी जान्हवीने पहिल्या फेरीत अरबाजला बाद केलं. तर, दुसऱ्या फेरीत वैभवने सूरजला बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र, तिसऱ्या फेरीपूर्वी घरात मोठा राडा होऊन आर्याने निक्कीला कानशि‍लात मारल्याची घटना घडली. यानंतर हा खेळ थांबवण्यात आला.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “आता मी ट्रॉफी आणि जावई घेऊनच येते घरी”, अंकिता वालावलकरच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “बाबा…”

जान्हवीने केला निर्धार

निक्की-अरबाजला या टास्कमध्ये बहुमत नव्हतं. त्यामुळे निक्की प्रचंड संतापली होती. घरात सगळीकडे तिचा मनमानी कारभार सुरू होता. यानंतर खेळ थांबवण्यात आल्यावर जान्हवी घरातील अंकिता, धनंजय आणि पॅडीशी संवाद साधताना म्हणाली, “ट्रॉफी मिळो न मिळो, मला हिचा गर्व उतरवायचाय. आता ती हतबल झालीये”

अंकिता यावर म्हणाली, “आम्ही उलटं तिला सांगत होतो… तू आम्हाला फुटेज देऊ नकोस बाहेर जा.” घरात घडलेला प्रकार पाहून धनंजय म्हणाला, “आता कुठे कॅप्टन्सी येईल असं वाटत होतं तेवढ्यात घरात हे राडे झाले. हाता तोंडाशी आलं होतं…सगळं गेलं”

Bigg Boss Marathi : धनंजय व अंकिता ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “संग्रामची शक्ती खूप कमी पडली…”, अरबाजच्या युक्तीचं आणि खेळाचं पहिल्यांदाच कौतुक; तिसऱ्या पर्वातील सदस्याची पोस्ट चर्चेत

हेही वाचा : Video : “मराठी जनता तुला ओळखत नव्हती, म्हणून…”, जान्हवीचं निक्कीला ओपन चॅलेंज; म्हणाली, “दम असेल तर…”

दरम्यान, आर्याने केलेल्या कृत्याबद्दल तिला ‘बिग बॉस’कडून मोठी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. ही शिक्षा नेमकी काय असेल हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे. यापूर्वी अशी घटना घडलेली तेव्हा बिग बॉसने संबंधित सदस्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र, यावेळी ‘बिग बॉस’कडून काय निर्णय घेतला जाणार याकडे सगळ्या प्रेक्षकांचं आणि विशेषत: आर्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.

कॅप्टनपदासाठी उमेदवार म्हणून अरबाज, सूरज, वर्षा, वैभव आणि धनंजय असे पाच सदस्य दावेदार होते. यापैकी जान्हवीने पहिल्या फेरीत अरबाजला बाद केलं. तर, दुसऱ्या फेरीत वैभवने सूरजला बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र, तिसऱ्या फेरीपूर्वी घरात मोठा राडा होऊन आर्याने निक्कीला कानशि‍लात मारल्याची घटना घडली. यानंतर हा खेळ थांबवण्यात आला.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “आता मी ट्रॉफी आणि जावई घेऊनच येते घरी”, अंकिता वालावलकरच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “बाबा…”

जान्हवीने केला निर्धार

निक्की-अरबाजला या टास्कमध्ये बहुमत नव्हतं. त्यामुळे निक्की प्रचंड संतापली होती. घरात सगळीकडे तिचा मनमानी कारभार सुरू होता. यानंतर खेळ थांबवण्यात आल्यावर जान्हवी घरातील अंकिता, धनंजय आणि पॅडीशी संवाद साधताना म्हणाली, “ट्रॉफी मिळो न मिळो, मला हिचा गर्व उतरवायचाय. आता ती हतबल झालीये”

अंकिता यावर म्हणाली, “आम्ही उलटं तिला सांगत होतो… तू आम्हाला फुटेज देऊ नकोस बाहेर जा.” घरात घडलेला प्रकार पाहून धनंजय म्हणाला, “आता कुठे कॅप्टन्सी येईल असं वाटत होतं तेवढ्यात घरात हे राडे झाले. हाता तोंडाशी आलं होतं…सगळं गेलं”

Bigg Boss Marathi : धनंजय व अंकिता ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “संग्रामची शक्ती खूप कमी पडली…”, अरबाजच्या युक्तीचं आणि खेळाचं पहिल्यांदाच कौतुक; तिसऱ्या पर्वातील सदस्याची पोस्ट चर्चेत

हेही वाचा : Video : “मराठी जनता तुला ओळखत नव्हती, म्हणून…”, जान्हवीचं निक्कीला ओपन चॅलेंज; म्हणाली, “दम असेल तर…”

दरम्यान, आर्याने केलेल्या कृत्याबद्दल तिला ‘बिग बॉस’कडून मोठी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. ही शिक्षा नेमकी काय असेल हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे. यापूर्वी अशी घटना घडलेली तेव्हा बिग बॉसने संबंधित सदस्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र, यावेळी ‘बिग बॉस’कडून काय निर्णय घेतला जाणार याकडे सगळ्या प्रेक्षकांचं आणि विशेषत: आर्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.