Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे आठ आठवडे सुरळीत पार पडले आहेत. आता नववा आठवडा सुरू झाला आहे. मागील दोन आठवड्यांमध्ये घरातील दोन-दोन सदस्य ‘बिग बॉस मराठी’तून बाहेर झाल्याचं पाहायला मिळालं. सातव्या आठवड्यात आर्याने निक्कीला कानशिलात लगावल्यामुळे तिला ‘बिग बॉस’ने थेट बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर वैभव चव्हाण एलिमिनेट झाला. आठव्या आठवड्यात तेच चित्र पुन्हा पाहायला मिळालं.

शनिवारी, २१ सप्टेंबरला झालेल्या भाऊच्या धक्क्यावरून वैद्यकीय कारणास्तव संग्राम चौगुले घराबाहेर झाला. तरी देखील नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. आठव्या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या पाच सदस्यांमधून अरबाज पटेल एलिमिनेट झाला. यामुळे अरबाज आणि निक्की जोडी तुटली. अरबाज घराबाहेर होताना निक्की ढसाढसा रडताना दिसली. मुख्य द्वारपाशी अरबाजचे पाय पकडून निक्की जोरजोरात रडत होती. अरबाज घराबाहेर आल्यामुळे निक्की पूर्णपणे आता खचलेली पाहायला मिळत आहे. याचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. अशातच घराबाहेर आल्यानंतरची अरबाजची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. तो नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या….

हेही वाचा – Video: “आता रडायचं नाही”, अरबाज बाहेर पडल्यानंतर सूरजने दिला निक्कीला आधार, म्हणाला, “मी आहे ना…”

नुकताच अरबाज पटेलने ‘राजश्री मराठी’ या एंटरटेनमेंट चॅनेलशी संवाद साधला. यावेळी त्याला विचारलं की, ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आलो आहे हे पटतंय का? यावर अरबाज म्हणाला, “मलाच काय पूर्ण महाराष्ट्राला पटत नाहीये की, सगळे हेच म्हणतायत, अरबाजबरोबर अनफेअर झालं आहे. खूप मोठा प्रवास होता. मी तर टॉप-२ आणि स्वतःला विजेता म्हणून बघत होतो. लोक देखील बघत होते. कारण माझा गेम प्लॅन कसा आहे. कसा गेम खेळत होतो. त्यामुळे सगळ्यांना वाटतं होतं अरबाज इतक्या लवकर बाहेर पडणार नाही आणि मला पण माहिती होतं मी एवढ्या लवकर बाहेर पडणार नाही. म्हणून तुम्ही बघितलं असेल मी निघत असताना माझ्या डोळ्यात अश्रू नव्हते. खूप आश्चर्याचा धक्का बसला होता. असं वाटलं नाही गेमसाठी काही केलं नाही म्हणून बाहेर आहे. मी गेमसाठी खूप केलं. सगळ्यांनी बघितलं आहे. तुम्ही बघितलं आहे. मी सगळ्यांना खूप एंटरनेट केलंय.”

हेही वाचा – “त्याचा पतंगाची दोरी…”, अरबाज पटेलच्या एलिमिनेशनवर मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट, म्हणाला…

एलिमिनेशनची प्रक्रिया ‘अशी’ पार पडली…

अरबाज, निक्की, वर्षा, सूरज आणि जान्हवी यांना अ‍ॅक्टिव्हिटी एरियामध्ये बोलावलं. या एरियामध्ये नॉमिनेट झालेल्या सदस्याची बॅग ठेवण्यात आली होती. या बॅगमध्ये संबंधित सदस्य सेफ आहे की डेंजर झोनमध्ये याच्या पाट्या ठेवण्यात आल्या होत्या. वर्षा, सूरज आणि जान्हवी यांच्या बॅगमध्ये सेफची पाटी होती. त्यामुळे हे तिघजण घराबाहेर जाण्यापासून वाचले. पण अरबाज आणि निक्की डेंजर झोनमध्ये गेले. त्यानंतर ‘बिग बॉस’ने अरबाज एलिमिनेट झाल्याचं जाहीर केलं. हे ऐकताच निक्कीने टाहो फोटला.