Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील गुरुवारच्या (२९ ऑगस्ट) भागात ‘पाताळ लोक’ टास्क पार पडला. यात पाताळ लोकामध्ये जाऊन सोन्याची नाणी जमा करायचा हा खेळ होता. या टास्कमध्ये ‘ए’ टीममध्ये निक्की-अभिजीत, घन:श्याम – पॅडी, वैभव-धनंजय या जोड्या होत्या. तर ‘बी’ टीममध्ये जान्हवी-सूरज, अरबाज-आर्या, अंकिता-वर्षा या जोड्या होत्या. सर्वाधिक नाणी ‘बी’ टीमने जमा करून या टास्कमध्ये विजय मिळवला. त्यानंतर विजयी झाल्यामुळे ‘बी’ टीमला एक विशेष अधिकार देण्यात आला. तो म्हणजे कॅप्टन्सीच्या रेसमधून हरलेल्या ‘ए’ टीममधून दोन जोड्या बाद करण्याचा निर्णय ‘बी’ टीमच्या हाती देण्यात आला. त्यामुळे ‘बी’ टीमने ‘ए’ टीममधील निक्की-अभिजीत आणि पंढरीनाथ-घनःश्याम या दोन जोड्यांना कॅप्टन्सीच्या रेसमधून बाहेर केलं. आज कॅप्टन्सीचा टास्क पार पडणार आहे. यासंदर्भात एक धक्कादायक प्रोमो समोर आला आहे.

आर्या, वैभव, अंकिता, जान्हवी, वर्षा उसगांवकर, धनंजय आणि सूरज हे या आठवड्यासाठी कॅप्टन्सीचे उमेदवार आहेत. त्यामुळे ‘कलर्स मराठी’ने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये हे सातही सदस्य कॅप्टन्सी मिळण्याकरता आपापलं मत मांडताना दिसत आहेत. पण त्यानंतर ‘बिग बॉस’ने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. नेमकं काय घडलं आहे? जाणून घ्या…

Bigg Boss Marathi Season 5 (Photo Credit – Colors Marathi)

हेही वाचा – Video: “या पर्वात माणुसकी नाही…”, अभिजीत सावंतच्या संदर्भातील ‘त्या’ निर्णयावरून भडकली सोनाली पाटील, म्हणाली…

‘बिग बॉस’चा निर्णय ऐकताना निक्की झाला आनंद

नव्या प्रोमोमध्ये, कॅप्टन्सी मिळण्यासाठी पात्र सदस्य आपली मत मांडत आहेत. यावेळी जान्हवी म्हणते, “मी या कॅप्टन पदासाठी योग्य आहे.” त्यानंतर अंकिता म्हणते, “मला इम्युनिटी मिळालीच पाहिजे.” सूरजही म्हणतो, “मलाच भेटलं पाहिजे.” शेवटी या सातही सदस्यांमध्ये बहुमत होतं नाही. त्यामुळे जान्हवी जाहीर करते की, ‘बिग बॉस’ बहुमत होतं नाहीये. त्यानंतर ‘बिग बॉस’ धक्कादायक निर्णय देतं म्हणतात, “आता नवा कॅप्टन निवडण्याचा निर्णय बाहेर बसलेले सदस्य घेतील.” हे ऐकताना निक्की आनंदाने टाळ्या वाजताना दिसत आहे.

बाहेर बसलेल्या सदस्यांमध्ये निक्की-अभिजीत, पंढरीनाथ-घनःश्याम आणि अरबाज आहे. त्यामुळे हे पाच सदस्य या आठवड्याचा कॅप्टन निवडणार आहेत. आता हे पाच सदस्य कोणाला कॅप्टन पद देतायत? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

हेही वाचा – Video: “संचालक चुकीचे…”, धनंजय पोवारच्या आई व पत्नीच्या संतप्त भावना, म्हणाल्या, “जीव तोडून २७ नाणी गोळा केली…”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या आठवड्यात निक्की, अभिजीत, अंकिता आणि वर्षा उसगांवकर घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. पण असं असलं तरी दुसऱ्याबाजूला वॉटिंग लाइन बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या आठवड्यात काहीतरी नवी घडणार असल्याचा अंदाज प्रेक्षक लावत आहेत.