Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. यंदाच्या पर्वाचा महाअंतिम सोहळा उद्या ( ६ ऑक्टोबर ) पार पडणार आहे. यासाठी रितेश देशमुखने दोन आठवड्यांचा ब्रेक घेऊन भाऊच्या धक्क्यावर पुनरागमन केलं आहे. महाअंतिम सोहळा पार पडण्याआधी यंदा या खेळात सहभागी झालेल्या सगळ्या सदस्यांनी घरात रिएन्ट्री घेतली होती.

यंदाचा सीझन २८ जुलैला ( Bigg Boss Marathi ) सुरू झाला होता. यावेळी घरात एकूण १६ जणांनी प्रवेश घेतला होता. यानंतर काही आठवड्यांनी घरात वाइल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाली. अखेर आता हा ७० दिवसांचा प्रवास संपणार आहे. घरात सगळ्या सदस्यांचं रियुनियन झाल्यावर अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : रितेश देशमुख ग्रँड फिनालेसाठी सज्ज! समोर आला डॅशिंग लूक; २ आठवड्यांच्या ब्रेकनंतर भाऊच्या धक्क्यावर परतला

वैभव अरबाजबद्दल काय म्हणाला?

वैभवने घरात ( Bigg Boss Marathi ) एन्ट्री घेतल्यावर त्याने सर्वप्रथम जान्हवीची भेट घेतली. यावेळी जान्हवी म्हणाली, “मी तुझ्यासाठी अरबाजला कॅप्टन बनवलं.” यावर वैभव म्हणतो, “अरबाज घाणेरडा गेम खेळलाय… घाणेरडा म्हणजे प्रॉपर घाणेरडा गेम खेळला. माझं डोकं कोणत्या लेव्हलला गेलंय… हे मी तुला सांगूही शकत नाही. तो पूर्णपणे फेक माणूस आहे.”

जवळच्या मित्राचं हे बोलणं ऐकून जान्हवी म्हणाली, “आपण B ग्रुपमध्ये असतो, तर वैभव हे सगळे हलले असते आपण दोघंही नक्की टॉप-५ मध्ये असतो. आपली मैत्री चुकली…पण, याचा दोष मी त्यांना नाही देणार…कारण, मी चुकले. तू गेल्यावर मी खेळात एकटी पडले. तुला खूप मिस केलं.”

हेही वाचा : ८ वर्षांत मोडला प्रेमविवाह, दुसऱ्या लग्नाआधी स्वीकारला इस्लाम धर्म; Bigg Boss 18 मध्ये दिसणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता

हेही वाचा : Devara Box Office Collection : ज्युनियर एनटीआरच्या सिनेमाची पहिल्या आठवड्यात जबरदस्त कामगिरी, एकूण कलेक्शन तब्बल ‘इतके’ कोटी

दरम्यान, आज घरात सगळ्या सदस्यांचं रियुनियन झाल्यावर वैभवने अरबाजशी अजिबात संवाद साधला नाही. एवढंच नव्हे तर, ‘बिग बॉस’च्या घरातील पिकनिक स्पॉटवर जाऊन वैभवने मी आता ‘टीम B’मध्ये प्रवेश करतो असं देखील सर्वांसमोर जाहीर केलं. त्यामुळे ‘टीम ए’मध्ये असलेल्या निक्की, अरबाज, जान्हवी आणि वैभव यांच्या चौघांच्या मैत्रीत आता कायमस्वरुपी फूट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. आता सध्या टॉप-६ मध्ये असणाऱ्या सदस्यांपैकी ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.