Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘ए’ टीममध्ये उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. अरबाज, वैभव, जान्हवी, निक्की, घन:श्याम हे सगळे सदस्य पहिल्या दिवसापासून एकत्र गेम खेळत होते. परंतु, गेल्या काही दिवसांत घरात अशा काही घटना घडल्या की, या पाच जणांच्या मैत्रीत आता दुरावा निर्माण झाला आहे. एकमेकांसाठी नेहमीच खंबीरपणे भांडणारी ‘ए’ टीम आता आपआपसांत भांडत असल्याचं दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाचव्या आठवड्यात सुरुवातीला निक्की-अरबाजमध्ये अभिजीतवरून भांडणं होणार आहेत. तर, याच वादात नंतर वैभव उडी घेणार आहे. भाऊच्या धक्क्यावर निक्कीला रितेश देशमुखने तिच्या विरोधात तिचे मित्रमंडळी कशा चुगल्या करतात याच्या क्लिप्स दाखवल्या होत्या. हे सगळे व्हिडीओ पाहून निक्कीने सर्वांसमोर ‘ए’ टीमधून एक्झिट घेत असल्याचं सांगितलं. निक्कीने ग्रुप सोडल्यापासून या सगळ्या सदस्यांमध्ये जोरदार भांडणं होत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : Video : अरबाजने फोडली भांडी; बेडरुममध्ये केली तोडफोड! ‘बिग बॉस’च्या घरात मोठा राडा; निक्कीची ‘ती’ गोष्ट खटकली

Bigg Boss Marathi : निक्की – अरबाजमध्ये वाद

अरबाजने अभिजीत व निक्कीला एकत्र पाहून घरात आदळआपट केल्याचं आजच्या भागात पाहायला मिळेल. अरबाज घरातली भांडी फोडून आपला राग व्यक्त करेल यानंतर या वादात वैभव आणि जान्हवी उडी घेणार आहेत. निक्की सर्वांना उद्देशून सांगते, “मी महाराणी आहे” यावर जान्हवी म्हणते, “तुझ्यात नोकराणी व्हायची देखील क्षमता नाहीये.”

निक्कीवर वैभव देखील संतापतो त्यावर ती म्हणते, “वैभव तुझी लायकी आहे का कॅप्टन होण्याची…” पुढे, “ए नासके बस्स कर आता” असं म्हणत वैभव तिला ताकीद देतो. यानंतर निक्की वैभवला “बच्चू चल जा” म्हणत हिणवते.

Bigg Boss Marathi

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : “आता शांत बसायचं, तुमचा गेम संपलाय…”, रितेश भडकल्यावर घन:श्यामने रडून जोडले हात! नेमकं काय घडलं?

शेवटी वैभव निक्कीला “थोबाड दिलंय म्हणून काहीपण बोलू नकोस… नाही तुझी मस्ती जिरवली तर बघ” असं सांगतो. यावर निक्की त्याला “गप्प भुसनाळ्या” म्हणते. हा प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यामधील आक्षेपार्ह भाषा…दोन्ही सदस्यांनी चुकीचे शब्द वापरून एकमेकांना अपमानित केलं आहे. आता हा वाद मिटणार की, अजून वाढणार हे प्रेक्षकांना आजच्या भागात पाहायला मिळेल.