छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या.’ गेल्या ९ वर्षांत या कार्यक्रमाने प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन केलं. या कार्यक्रमामुळे भाऊ कदम, कुशल बद्रिके सारखे अनेक कलाकार घराघरात पोहचले. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र, आता विश्रांतीनंतर हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर या संदर्भात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा- Video : प्रसिद्ध मराठी गाणे म्हणता न आल्याने अरुंधती झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले, “ही गायिका…”

Traffic jam at Jamtha T-point even before start of cricket match
क्रिकेट सामना सुरु होण्यापूर्वीच जामठा टी-पॉइंटवर वाहन कोंडी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Amrit Gatha of Chartered Officer Abhijit Raut
नांदेडमध्ये अडीच वर्षे राहिले; अन् बंगल्याचे नाव बदलून गेले!
Mumbais Water for All policy provided 7868 new water connections by December 2024
कळवा, मुंब्रा आणि दिव्यात शुक्रवारी पाणी नाही, एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती
is state currently stopped issuance of birth certificates to track down illegal Bangladeshi citizens
अवैध बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू? ‘या’ आदेशाने चर्चेस बळ
Loksatta balmaifal Kashmir Tour Himalayas Natural Beauty
काश्मीरची संस्मरणीय सहल
pune mns Office bearers and activists became Active during elections time
पुण्यात ‘मनसे’ला मराठी माणसाची पुन्हा आठवण
Why is there a delay in the appointment of candidates who have passed MPSC
कोलमडलेले वेळापत्रक, न्यायालयीन विलंब, लालफीतशाही… ‘एमपीएससी’ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीस विलंब का होतो?

निलेश साबळेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चला हवा येऊ द्या कार्यक्रमासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने चला हवा येऊ द्या कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे. व्हिडीओमध्ये निलेश साबळेसह भाऊ कदमही दिसत आहे. व्हिडीओमध्ये भाऊ मी पुन्हा येतोय. मी पुन्हा येतोय ‘चला हवा येऊ द्या’ आता सोमवार ते शनिवार” म्हणताना दिसत आहे. तर निलेश साबळे “बरोबर ऐकताय तुम्ही, चला हवा येऊ द्या आता फक्त सोमवार, मंगळवारीच नाही, तर सोमवार ते शनिवार म्हणजेच संपूर्ण आठवडाभर असणार नवेकोरे एपिसोड्स. तेव्हा पाहायला विसरू नका ‘चला हवा येऊ द्या’ सोमवार ते शनिवार” असं म्हणताना दिसत आहे.

‘चला हवा येऊ द्या’चा पहिला भाग २०१४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सुरुवातीला या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसाद मिळाला. पण नंतर नंतर या कार्यक्रमातील तोच तो पणा प्रेक्षकांना रुचेनासा झाला. हा कार्यक्रम सुमार होत चालल्याची अनेक प्रेक्षकांनी तक्रारही केली होती.

हेही वाचा- ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्रीने गोव्यात सुरू केला नवा व्यवसाय; म्हणाली, “आमचं छोटंसं घर आता…”

प्रेक्षकांच्या तक्रारीनंतर चला हवा येऊ द्याच्या निर्मात्यांनी कार्यक्रमाच्या नवनवीन उपक्रम राबवले. मात्र या उपक्रमांना म्हणावा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. दिवसेंदिवस या कार्यक्रमाचा टीआरपी घसरतच गेल्याच बघायला मिळत होतं. त्यामुळे ‘झी मराठी’ वाहिनीने हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

Story img Loader