‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय ठरली. २०१५ मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेच्या निमित्ताने अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, स्वानंदी टिकेकर, पुष्कराज चिरपूटकर, पूजा ठोंबरे हे कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले. आजही ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेचे नवे पर्व सुरु करा अशी मागणी प्रेक्षकवर्गाकडून सातत्याने केली जाते. यासदंर्भात नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मालिकेच्या मुख्य कलाकारांनी भाष्य केले आहे.

हेही वाचा : “जावईबापू जिंदाबाद”, सासरहून प्रवीण तरडेंना मिळालं अधिकमासाचं वाण, पत्नीने शेअर केला व्हिडीओ

vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Rajkummar Rao and Patralekhaa Love Story
“तो खूप विचित्र…”, राजकुमार रावच्या पत्नीने सांगितला त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा; म्हणाली, “मुंबई पुणे प्रवासात त्यानेच…”
Shibani Dandekar praised husband farhan akhtar first wife
मराठमोळ्या शिबानी दांडेकरने पतीच्या पहिल्या बायकोचं केलं कौतुक; सावत्र मुलींबरोबरच्या नात्याबद्दल म्हणाली, “त्या खूप…”
Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”
A School Boy help his disabled friend selfless friendship Video
यालाच म्हणतात,”मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…!”, दिव्यांग मित्राच्या मदतीला धावून आला चिमुकला, निस्वार्थ मैत्रीचा Video Viral
Priyanka Chopra Praises Aaj Ki Raat song from stree 2
प्रियांका चोप्रा ‘स्त्री २’मधील ‘या’ गाण्याच्या प्रेमात; कलाकारांची स्तुती करीत म्हणाली, “तू एकदम छान, तो तर अगदी सोनं”
actress suruchi adarkar express her feeling about her husbond piyush ranade on occasion of ganesh festival
लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सावानिमित्ताने अभिनेत्री सुरुची अडारकरने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, “बाप्पा, तुझ्या येण्याने… “

अलीकडेच मालिकेच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी काही प्रमुख कलाकारांनी केक्राफ्टच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. या वेळी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने या मालिकेमुळे यातील प्रमुख कलाकारांच्या जीवनात कसा बदल झाला? अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना सांगितल्या. अभिनेत्री म्हणाली, “सुरुवातीला आमच्या मालिकेचा टीआरपी अजिबात जास्त नव्हता किंवा मालिकेचा टीआरपी छप्परफाड आहे अशा कोणत्याच गोष्टी नव्हत्या. आम्हाला पहिल्यांदाच १०.३० ची वेळ मिळाली होती. तरीही प्रेक्षकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला.”

हेही वाचा : सुश्मिता सेनची ‘ताली’ वेबसीरिज पाहिल्यानंतर हेमंत ढोमेची पोस्ट, म्हणाला “फारच…”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे आम्ही सगळे आज टिव्ही माध्यमाचा प्रचंड आदर करतो. टिव्ही माध्यमाचा आदर करायला आम्हाला ‘दिल दोस्ती’ने शिकवलं. तुम्ही जेव्हा टिव्हीवर काम करत असता तेव्हा तुमची तब्येत ठिक असू दे किंवा नसू दे…तुम्हाला चेहऱ्याला रंग लावून कॅमेऱ्यासमोर उभं राहावं लागतं. तर, अशा परिस्थितीत टिव्ही माध्यमावर काम कसे करायचे हे आम्हाला ‘दिल दोस्ती’ने शिकवले.”

हेही वाचा : “लेकीचं संगोपन आणि काम एकत्र कसं सांभाळतेस?” आलिया भट्टच्या उत्तराने वेधलं लक्ष, अभिनेत्रीचे विचार वाचून तुम्हीही कराल कौतुक

दरम्यान, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी आजच्या घडीला मनोरंजनसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वानंदी टिकेकरने ‘दिल दोस्ती…’नंतर आणखी दोन मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. सध्या अभिनेता सुव्रत जोशीच्या ‘ताली’ आणि अमेय वाघच्या ‘असुर’ वेब सीरिजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.