राष्ट्रवादीचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या आगामी भागात हजेरी लावणार आहेत. त्या भागाचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये डॉ. कोल्हे राजकारणाबद्दल व अभिनयक्षेत्राबद्दल विचारलेल्या प्रश्नांची सडेतोड उत्तरं देतात. या शोमध्ये निवेदक अवधूत गुप्तेने कोल्हे यांना एक फोन करायला सांगितलं. त्यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी लोकशाहीला फोन लावला.

तुमचं एका दिवसाचं मानधन जास्त की डॉक्टर मित्रांचं? डॉ. अमोल कोल्हे म्हणाले…

PM Narendra Modi and Rahul Gandhi
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना जोरदार उत्तर, “आम्ही संविधान जगणारे लोक, खिशात संविधान घेऊन…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”
marathi Vishwa sammelan Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: “मराठी माणूस कलहशील, त्याला…”, मी पुन्हा येईनची री ओढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खुमासदार भाषण
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “लोकशाहीच ना? नाही, आवाज थोडा खाली गेल्यासारखा जाणवला म्हणून विचारलं. कारण कसंय तू असण्यात, तू टिकण्यात १४० कोटी भारतीयांचं भवितव्य अवलंबून आहे. काही प्रश्न मनात होते म्हणून म्हटलं फोन करावा. प्रश्न पडले तरी ते विचारण्याचा अधिकार घटनेने दिला आहे, पण ते विचारण्याची आता मुभा नाही, मोकळीक नाही. कारण प्रश्न विचारले की ट्रोलधाड येते आणि देशद्रोह्याचा शिक्का मारून जाते आमच्या मस्तकावर. सियाचिनला मायनस २० डिग्री सेल्सियसमध्ये देशांच्या सीमांचं रक्षण मुलगा करत असतो आणि त्याचा ७५ वर्षांचा बाप दिल्लीत कडाक्याच्या थंडीमध्ये त्याच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करत असतो. त्या आंदोलकांपैकी काहींना मगरूर सत्ताधाऱ्यांच्या गाडीखाली निष्ठुरपणे चिरडलं जातं, तेव्हा प्रश्न निर्माण होतो की कुठल्या तोंडाने म्हणायचं जय जवान, जय किसान?”

KFC चा फुल फॉर्म काय? या फूड कंपनीची स्थापना कोणी केली होती? रंजक आहे कहाणी

दरम्यान, या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक अवधूत गुप्ते याने अमोल कोल्हेंना काही प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांना एका गोळीचा फोटो दाखवत ही डोकेदुखी गोळी कोणाला द्याल?, असा प्रश्न अमोल कोल्हेंना विचारला. त्यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस असे उत्तर दिले. तर, स्मरणशक्ती वाढवण्याची गोळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देणार असल्याचं ते म्हणाले.

Story img Loader